मुर्तिजापूर: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारात अन्न,
वस्त्र आणि निवाऱ्याचा समावेश आहे. मात्र, शासन गरीब अतिक्रमण धारकांना हक्क प्रदान करण्यास
टाळाटाळ करत असल्याचा आरोप समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज शेंडे यांनी केला आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
राज्यघटनेच्या अनुच्छेद 12 नुसार SDO (उपविभागीय अधिकारी) यांनी सरकारी E आणि F क्लास जमिनीवरील
अतिक्रमण धारकांना महसूल कायदा 1966 च्या कलम 51 अंतर्गत नियमबद्ध करून मालकी हक्क द्यावा,
अशी मागणी शेंडे यांनी केली आहे. शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास “करो या मरो” आंदोलन छेडण्यात येईल,
असा इशाराही त्यांनी दिला.
शासनाकडून दुर्लक्षाचा आरोप
शेंडे यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, राजकीय दबावामुळे श्रीमंत भांडवलदार आणि राजकारणी लोकांना
महसूल कायद्यातील कलम 51 च्या आधारे सरकारी जमिनीचा मालक बनवले जाते.
मात्र, 30 ते 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब जनतेच्या अतिक्रमणाचे नियमितीकरण करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
आंदोलनाचा इतिहास
समाज क्रांती आघाडीने मागणीसाठी अनेकदा आंदोलन केले आहे:
- 15 ऑगस्ट 2019: आमरण उपोषण
- 4 ऑक्टोबर 2019: मोर्चा
- 15 ऑगस्ट 2024: पुन्हा आमरण उपोषण
यासोबतच, 25 मंजूर प्रस्ताव ऑनलाईन असूनही शासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
त्यामुळे शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
मोर्चात असंख्य नागरिकांचा सहभाग
या आंदोलनात समाज क्रांती आघाडीचे जिल्हा संघटक सुदामभाऊ शेंडे,
तसेच निरंजन गवई, धममनंद तायडे, अजाबराव दामले, बंडू डोंगरे, नंदू नानिर, विनोद इंगळे, सतीश इंगळे,
धनराज सावंत, राजू अंभोरे, दिवाकर इंगळे, प्रवीण चाहकर, दादाराव सरदार, प्रकाश जमनिक,
चंद्रभान घने आदींसह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक उपस्थित होते.
— मा. सुदाम शेंडे (जिल्हा संघटक, समाज क्रांती आघाडी)
दिनांक: 27/02/2025
Read more news here : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case/