मुर्तिजापूर: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारात अन्न,
वस्त्र आणि निवाऱ्याचा समावेश आहे. मात्र, शासन गरीब अतिक्रमण धारकांना हक्क प्रदान करण्यास
टाळाटाळ करत असल्याचा आरोप समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज शेंडे यांनी केला आहे.
Related News
पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर; पूरस्थितीवरून केलेला दावा फेटाळला, ‘बिनबुडाचे आरोप’ म्हणत पाकिस्तानचा बुरखा फाडला
भारत आणि पाकिस्तान...
Continue reading
माजी गृहमंत्र्यांचं महिला पोलिसांसोबत गैरवर्तन? नवनाथ बन यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; ‘विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार का?’
छत्रपती संभाजीनगर
Continue reading
दररोज सॅलड खाताय, पण तरीही शरीराला पुरेसं फायबर मिळतंय का? डॉक्टरांचा मोठा खुलासा; ‘या’ पदार्थांचा आहारात नक्की करा समावेश
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत
Continue reading
EPF Balance: व्याजाची रक्कम खात्यात जमा झाली की नाही? मोबाईलवरून 'या' 4 सोप्या पद्धतीने लगेच तपासा
EPF Interest Credit 2025-26: कर...
Continue reading
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पण CJPचं आंदोलन सुरूच; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सरकारची कोंडी कायम
सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वा...
Continue reading
JP Nadda Meet CJP Leaders : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर CJP ठाम; बैठकीत नेमकं काय घडलं? आशुतोष रांकांनी सांगितली Inside Story
J...
Continue reading
Share Market Crash: ट्रम्प यांच्या एका घोषणनेने जगाला हादरवले! भारतापासून युरोपपर्यंत शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
Sh...
Continue reading
ITR Filing: 31 जुलै, 31 ऑगस्ट की 31 ऑक्टोबर? तुमच्यासाठी ITR भरण्याची अंतिम मुदत कोणती, जाणून घ्या संपूर्ण माहिती
ITR Filing Deadline 202...
Continue reading
करिश्मा कपूरचा 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा; संजय कपूर यांच्या कंपनीचा निकाल जाहीर, नफ्यात तब्बल 45 टक्क्यांची वाढ
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा
Continue reading
गोड खायची इच्छा झालीये? बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी काही मिनिटांत बनवा नारळाचे हे 4 चविष्ट पदार्थ
जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटणं ही ...
Continue reading
Amit Thackeray : ‘तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडली नसती’; अमित ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
विद्यार्थी आंदोलन, NEET पेपर...
Continue reading
Explained: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Gen Z स्टाईल व्हिडीओ का केला? 5 कारणं आली समोर; ‘मित्रों’ऐवजी ‘Friends’ म्हणण्यामागे काय?
PM Modi Viral...
Continue reading
राज्यघटनेच्या अनुच्छेद 12 नुसार SDO (उपविभागीय अधिकारी) यांनी सरकारी E आणि F क्लास जमिनीवरील
अतिक्रमण धारकांना महसूल कायदा 1966 च्या कलम 51 अंतर्गत नियमबद्ध करून मालकी हक्क द्यावा,
अशी मागणी शेंडे यांनी केली आहे. शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास “करो या मरो” आंदोलन छेडण्यात येईल,
असा इशाराही त्यांनी दिला.
शासनाकडून दुर्लक्षाचा आरोप
शेंडे यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, राजकीय दबावामुळे श्रीमंत भांडवलदार आणि राजकारणी लोकांना
महसूल कायद्यातील कलम 51 च्या आधारे सरकारी जमिनीचा मालक बनवले जाते.
मात्र, 30 ते 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब जनतेच्या अतिक्रमणाचे नियमितीकरण करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
आंदोलनाचा इतिहास
समाज क्रांती आघाडीने मागणीसाठी अनेकदा आंदोलन केले आहे:
- 15 ऑगस्ट 2019: आमरण उपोषण
- 4 ऑक्टोबर 2019: मोर्चा
- 15 ऑगस्ट 2024: पुन्हा आमरण उपोषण
यासोबतच, 25 मंजूर प्रस्ताव ऑनलाईन असूनही शासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
त्यामुळे शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
मोर्चात असंख्य नागरिकांचा सहभाग
या आंदोलनात समाज क्रांती आघाडीचे जिल्हा संघटक सुदामभाऊ शेंडे,
तसेच निरंजन गवई, धममनंद तायडे, अजाबराव दामले, बंडू डोंगरे, नंदू नानिर, विनोद इंगळे, सतीश इंगळे,
धनराज सावंत, राजू अंभोरे, दिवाकर इंगळे, प्रवीण चाहकर, दादाराव सरदार, प्रकाश जमनिक,
चंद्रभान घने आदींसह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक उपस्थित होते.
— मा. सुदाम शेंडे (जिल्हा संघटक, समाज क्रांती आघाडी)
दिनांक: 27/02/2025
Read more news here : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case/