पुण्यात लग्नानंतर काही दिवसांतच एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मध्यवर्ती भागातील समर्थ पोलीस ठाण्यात २३ वर्षीय तरुणीने पतीसह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे. मुलगा नपुंसक असल्याची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवत लग्न लावल्याचा तसेच नंतर धमक्या, मानसिक छळ आणि बदनामी केल्याचा तिने आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.
काय आहे तक्रारदार तरुणीचा आरोप?
तक्रारीनुसार, पीडितेचा विवाह १८ एप्रिल २०२५ रोजी झाला. काही आठवड्यांतच तिला पतीमध्ये पुरुषत्व नसल्याची कल्पना आली. यानंतर तिने शांततेने हा मुद्दा पती व सासरच्या मंडळींसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षेप्रमाणे परिस्थिती हाताळण्याऐवजी तिच्यावरच उलट दबाव टाकण्यात आला, असे पीडितेने पोलिसांकडे नमूद केले.
तिने सांगितले की, “ही बाब घराबाहेर सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी तिला थेट धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर तिचेच एखाद्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप करून तिची बदनामी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. लग्नात पुरेसा मानपान केला नाही, अशा किरकोळ कारणांवरूनही तिला सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
Related News
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
सलमान खाननंतर आता आमिर खानलाही धमकी? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून पडताळणी सुरू
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबाबत सोशल मीडियावर समो...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
केतन अग्रवाल प्रकरणात नवे धक्कादायक दावे; सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत तपासात समोर आले नवे तपशील
पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात तप...
Continue reading
Nagpur Crime: 3 मित्रांचा धक्कादायक ड्रग्ज प्लॅन फसला; हॉटेलवर पोलिसांची मोठी धाड, एमडीसह रंगेहात अटक
नागपूरच्या रामदासपेठ येथील नामांकित हॉटेलमध...
Continue reading
कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोड परिसरात भाजप कार्यकर्ता सूरज साखरे याच्यावर भरदिवसा तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी असून...
Continue reading
पुणे क्राइम: बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत अनेक राजकीय नेत्यांची नावं, गंभीर आरोपांमुळे खळबळ
पुणे: शहरातील गुलटेकडी परि...
Continue reading
स्नॅपचॅटवर जुळलेल्या प्रेमासाठी ओडिशातील १८ वर्षीय तरुणी प्रियकरासोबत महाराष्ट्रात आली. नातेवाईक आणि पोलिस तिच्या शोधात पोहोचले, मात्र १०० रुपयांच्या ...
Continue reading
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये 150 कोटींच्या संपत्तीच्या मालकाची त्याच्याच मुलाने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. व्यसन, संपत्तीचा वा...
Continue reading
विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ! गिरिजा राऊत प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्...
Continue reading
'पप्पा, माझ्या जीवाला धोका आहे...'; अखेरचा फोन, बंद CCTV आणि कारमध्ये गायब झालेलं शव, लखनऊतील धक्कादायक प्रकरण
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यू...
Continue reading
पुण्यातील एफसी रोडवर मोबाईलवर बोलत स्कूटी चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "मी पुणे विकत घेतलंय" असे म्हणत तो घटनास्थळावरून ...
Continue reading
जाणीवपूर्वक लपवली महत्त्वाची माहिती?
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटले आहे की, पती नपुंसक असल्याची संपूर्ण माहिती कुटुंबीयांना होती, तरीही त्यांनी ती गोष्ट इंतेनशपूर्वक लपवून ठेवली. फसवणूक करून लग्न लावण्यात आल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकरणात पती, सासू, सासरे, नणंद, नणंदेचा पती आणि चुलत सासरा या सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
समर्थ पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधितांविरुद्ध फसवणूक, धमकी आणि मानसिक छळाचे गुन्हे नोंदवले आहेत. प्रकरणातील आरोप गंभीर असल्याने पुढील तपास गतीने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अशाच प्रकारची घटना येरवड्यातही
दरम्यान, मागील आठवड्यात येरवडा परिसरातही एक धक्कादायक घटना समोर आली होती. लग्नानंतर पती जवळीक साधत नसल्याची तक्रार पत्नीने केली. यावरून पती आणि सासरकडील मंडळींनी तिला सिगरेटचे चटके दिल्याचा प्रकार उघड झाला होता. त्या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
लग्नानंतर महिलांवरील छळाच्या घटना वाढत्या?
पुण्यात गेल्या काही महिन्यांत लग्नानंतर महिलांना छळ, धमक्या, मानसिक त्रास किंवा फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येते. पती किंवा सासरकडील मंडळींकडून महत्त्वाची माहिती लपवून लग्न करणे, त्यानंतर अत्याचार किंवा धमक्या देणे असे प्रकार चिंताजनक पातळीवर वाढत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
या घटनांमुळे विवाहापूर्वीच्या पडताळणीची, पारदर्शक संवादाची आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांची गरज अधोरेखित होत आहे. पुण्यातील दोन्ही ताज्या घटनांनी पुन्हा एकदा महिलांवरील छळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.