नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई याही या गौरवाच्या क्षणी भावुक झाल्या.
पण याच वेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत एक ठाम मतही मांडलं – “देशात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात.”
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
कमलाताई म्हणाल्या, “बॅलेट पेपर म्हणजे जनतेचा खरा कौल. आधी याच पद्धतीने निवडणुका होत असत
. ईव्हीएममुळे शंका निर्माण होतात. बाबासाहेबांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवलं आहे,
तर मग त्यांच्या मतदानाच्या विश्वासाला तडे का द्यायचा?”
भूषण गवई उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार असून,
त्यांच्या मातोश्रींनी केलेल्या विधानामुळे बॅलेट पेपरविषयी सुरू असलेल्या चर्चेला नवा आयाम मिळालाय.
विशेषतः महाविकास आघाडी व इतर पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमविरोधात प्रश्न उपस्थित होत असताना,
एका सरन्यायाधीशाच्या घरातून आलेला हा आवाज महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते उत्तम जाणकर यांनी बॅलेट पेपरच्या मागणीसाठी मोठं आंदोलन केलं होतं.
आता कमलाताई गवई यांच्या वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ईव्हीएम व बॅलेट पेपरवरील याचिकेच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.
READ MORE NEWS