सुकळी (ता. पातूर) – पातूर तालुक्यातील सुकळी ते सायवनी हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायवनीमार्गे मुख्य मळसूर रस्त्याकडे जाणारा हा मार्ग विशेषतः श्री क्षेत्र सोपिनाथ महाराज संस्थान, मळसूर येथे यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यावश्यक मानला जातो. मात्र रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेली डांबरीकरणाची पातळी यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आलेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परिणामी चार ते पाच किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे विस्कळीत झाला असून वाहनचालकांना मोठा फेरा मारत सुकळी फाटा मार्गे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक निवेदने सादर केली होती. मात्र त्या निवेदनांवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यात्रेचा कालावधी जवळ येत असताना रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Related News
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर CM फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘संविधानिक मागण्या असतील तर मार्ग काढू’
मनोज जरांगे पाटील : मराठा आर...
Continue reading
मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर; फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल, “त्यांचे 100 टक्के दिवस भरले आहेत”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज ज...
Continue reading
पावसाळ्यात सापांचा वाढतो वावर; कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… साप इथेच का लपतात?
Snake Safety Tips In Monsoon : गारवा, ओलावा आणि सुरक्षित आसऱ्याच्या शोधात साप घर, वाहन आणि बाथर...
Continue reading
शिंदे येतात तरी कशाला गद्दार लोकांचे मेळावे घेण्यासाठी? अंबादास दानवेंची घणाघाती टीका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा ए...
Continue reading
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मो...
Continue reading
शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार; जरांगेंचा इशारा, संजय जाधव म्हणाले- मेळावा रद्द होणार नाही
परभणीत खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव ...
Continue reading
पगार येताच संपतोय? या 7 आर्थिक सवयी आजपासून लावा; भविष्यातील पैशांची चिंता होईल कमी
महिन्याचा पगार खात्यात जमा झाल्यानंतर काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात खर्च
Continue reading
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा परभणी दौरा कायम; पुढील काही तासांत विविध कार्यक्रमांना उपस्थिती
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते
Continue reading
जरांगेंच्या इशाऱ्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; परभणीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, राजकीय वातावरण तापलं
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं...
Continue reading
नोकरी गेली तरी नो टेन्शन! PF खात्यातील 75% रक्कम काढता येणार; जाणून घ्या नवे नियम आणि पैसे काढण्याची प्रक्रिया
नोकरी जाणे किंवा नोकरी सोडावी लागणे ही कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी आर्थ...
Continue reading
Nepal Flood Update: नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार; भारतासह चार देशांकडून मदतीसाठी तज्ज्ञ पाठवण्याची तयारी
Nepal Flood News: Nepalमध्ये आलेल्या...
Continue reading
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी ओबीसींचा मोर्चा निघणारच; लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा
महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरण...
Continue reading
स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता सुकळीवरून चान्नीला जाण्यासाठी सर्वात सोयीचा आहे. परंतु सध्या खड्डेमय परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिकच कठीण झाले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन सुकळी ते सायवनी रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रस्त्याच्या कामाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत असली तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्ता रोकोचा इशारा
“रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा वाहनधारक सचिन जाधव (सुकळी) यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
read also: https://ajinkyabharat.com/chinese-robot-dog-controversy-ai-summit-madhuun-galgotias-university-la-bahercha-rasta-10-shocking-revelations/