सुकळी (ता. पातूर) – पातूर तालुक्यातील सुकळी ते सायवनी हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायवनीमार्गे मुख्य मळसूर रस्त्याकडे जाणारा हा मार्ग विशेषतः श्री क्षेत्र सोपिनाथ महाराज संस्थान, मळसूर येथे यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यावश्यक मानला जातो. मात्र रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेली डांबरीकरणाची पातळी यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आलेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परिणामी चार ते पाच किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे विस्कळीत झाला असून वाहनचालकांना मोठा फेरा मारत सुकळी फाटा मार्गे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक निवेदने सादर केली होती. मात्र त्या निवेदनांवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यात्रेचा कालावधी जवळ येत असताना रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Related News
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुढील दहा तासांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आ...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये; 3000 रुपयांच्या चर्चांवरही आली मोठी अपडेट
महाराष्ट्र सरकारच्या म...
Continue reading
एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगची झंझट संपणार! आता कनेक्शनशिवाय मिळणार सिलिंडर, 5 मिनिटांत घरपोच सेवा सुरू
घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर बुकिंग करणे, न...
Continue reading
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर; ‘ना त्यांनी संपर्क केला, ना मी’
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकन...
Continue reading
मोठी बातमी! शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकात फसलं? उद्धव ठाकरेंसमोर 15 नगरसेवकांची एकजूट; 5 कोटींच्या ऑफरचाही गौप्यस्फोट
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (
Continue reading
Supriya Sule : 'हा प्रश्न मला नाही, देवेंद्र फडणवीसांनाच विचारा'; जयंत पाटील यांच्या वर्षा भेटीवर सुप्रिया सुळेंची स्पष्ट भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष...
Continue reading
Delimitation Bill : 50 टक्के फॉर्म्युल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा? खासदारांच्या जागांबाबत सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
Delimitation Bill
Continue reading
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची निष्पक्ष चौकशी करा; गरज पडल्यास SIT स्थापन करा, सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मोठी मागणी
महाराष्ट्र सरकारच्या बहुचर्चित **‘
Continue reading
100 टक्के पेट्रोल मिळणार, पण त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील; नितीन गडकरींचं इथेनॉलवर मोठं विधान
E20 इंधनावरून सुरू असलेल्या वादात गडकरींची भूमिका स्पष्ट; म्हणाले- पर्याय उपलब्ध...
Continue reading
स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता सुकळीवरून चान्नीला जाण्यासाठी सर्वात सोयीचा आहे. परंतु सध्या खड्डेमय परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिकच कठीण झाले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन सुकळी ते सायवनी रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रस्त्याच्या कामाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत असली तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्ता रोकोचा इशारा
“रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा वाहनधारक सचिन जाधव (सुकळी) यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
read also: https://ajinkyabharat.com/chinese-robot-dog-controversy-ai-summit-madhuun-galgotias-university-la-bahercha-rasta-10-shocking-revelations/