नवी दिल्ली | 8 मे 2025 — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले.
या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
मात्र, भारताने S-400 ‘सुदर्शन चक्र’ प्रणालीचा वापर करत पाकिस्तानचा हवाई हल्ला हवेतच निष्प्रभ केला.
भारतीय हवाई दलाने काल उशिरा रात्री देशाच्या संरक्षण इतिहासात एक निर्णायक पाऊल उचलत S-400
क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहाय्याने आक्रमक हल्ल्याचे लक्ष्य अचूकपणे भेदले.
ही प्रणाली 400 किलोमीटरपर्यंत कोणतेही हवाई लक्ष्य भेदू शकते आणि ती अमेरिका, चीनसारख्या बलाढ्य
राष्ट्रांच्या हत्यारांनाही रोखू शकते, असं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अत्याधुनिक रशियन प्रणाली भारतासाठी ‘गेम चेंजर’
2018 मध्ये रशियाकडून भारताने तब्बल 5 अब्ज डॉलर्सच्या करारातून S-400 प्रणाली विकत घेतली.
यातील काही युनिट्स भारतात कार्यरत असून, संवेदनशील सीमांवर तैनात आहेत. या प्रणालीमुळे पाकिस्तानसारख्या शेजारी
देशांकडून होणारे हवाई हल्ले यशस्वीपणे परतवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.
हल्ल्याचे ठिकाण किंवा पाकिस्तानने दागलेल्या क्षेपणास्त्रांचे नेमके स्वरूप अद्याप उघड झालेले नाही.
मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हे संभाव्य घातक हल्ले होते. भारताने ‘फायर बिफोर फॉग’
नीती वापरत अचूकतेने आणि वेळीच प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे कोणताही मोठा अनर्थ टळला.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorwar-cm-yoginchi-clear-role/