महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मुसळधार
पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटले की,
पुढील दोन ते तीन दिवस या राज्यांमध्ये तसेच गुजरात आणि गोव्याच्या
Related News
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान
खात्याने सांगितले की, बांगलादेश आणि गंगा नदीच्या लगतच्या पश्चिम
बंगाल भागात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
त्यामुळे येत्या दोन दिवसांत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंडमध्ये
ही पावसाची शक्यता आहे. याबाबत विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
IMD ने सांगितले की, 26 ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार
ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 ते 29 ऑगस्टपर्यंत
पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये असेच हवामान
कायम राहील. येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा,
पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्येही मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. वादळी वाऱ्यासह
पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार
आज काही जिल्ह्यांना रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
मुंबई, पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. राज्यातील अनेक भागात
अतिमुसळधार पावासाचा इशारा ही देण्यात आला होता.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आले होते.