राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय
घेण्यास वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti )
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
यांनी केली. Raju Shetti : राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या
टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केली आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गात
चौपट मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी मोजणी करु न देण्याचा निर्णय घेतल्याचे शेट्टी म्हणाले.
चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे.
महामार्गाला चौपट मोबदला दिल्याशिवाय मोजणीस विरोध केल्यावर जबरदस्तीने
भुसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांन हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर
करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने
भुसंपादन केले जात आहे. राजू शेट्टी यांनी थेट हातकंणगले पोलिस
ठाण्यात शेतकऱ्यांची भेट घेऊन मोजणी थांबविण्यास सांगितले.
शेतकऱ्यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास राजू शेट्टी
यांच्या नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार
असल्याचे शेट्टी म्हणाले. राज्य सरकार वेळ काढूपणा करून शेतक-
यांच्या जमीनी कवडीमोल दराने काढून घेण्याचा घाट करत
असल्याचे शेट्टी म्हणाले.
Read more news here :https://ajinkyabharat.com/sanjay-raut-home-minister-mhanje-divyach-aht-yogesh-kadhanchaya-tya-vasavyavarun-sanjay-raut-bhadkle/