नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडला आहे. हा वैमानिक पाकिस्तानच्या वायुदलातील असून तो JF-17 लढाऊ विमानात सवार होता. भारताने हे विमान पाडल्यानंतर वैमानिकाने आपले प्राण वाचवण्यासाठी आपत्कालीन पॅराशूटचा वापर केला. त्यानंतर तो लाठी परिसरात उतरला आणि तेथे भारतीय लष्कराच्या ताब्यात गेला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या वैमानिकाला एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र तो पाकिस्तानच्या वायुदलातील वरिष्ठ अधिकारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची आक्रमक भूमिका
Related News
आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
आरोग्याबाबत जागरूकतेने आहाराची निवड करणे महत्त्वाचे असते. शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे य...
Continue reading
छत्तीसगढ: माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा, 2003 मधील राजकीय हत्येचा प्रकरण ठरलं ठराविक
छत्तीसगढ उच्च न्यायालयाने माजी आमदार आणि अजीत जोगी यांच्या म...
Continue reading
खात्यावर थेट येणार 1 कोटी! PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला; जाणून घ्या कसं होईल श्रीमंत
PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला : आपल्या पैशांना सुरक्षित ठेवत simultaneously भविष्यात मोठी रक्...
Continue reading
अमेरिका-इ्राण युद्धात धक्कादायक वळण: डोनाल्ड ट्रम्पची अचानक घोषणा, कॅनडावर हल्ला रद्द
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय तणाव वाढला
अमेरिका आणि इराणद...
Continue reading
नवीन फ्रिज खरेदी करायची आहे? या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना घरात फ्रिजची गरज प्रचंड वाढते. विशे...
Continue reading
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल गाढ झोप, सकाळी उठाल ताजेतवाने
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री झोप येणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. द...
Continue reading
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत अभूतपूर्व गफलत : अज्ञात कारने फोडले मुख्य गेट, फुलांचा गुच्छ ठेवून चालक फरार
— सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
दिल्लीच्या राजकारणाचे आणि प्रशासकी...
Continue reading
Pune, April 6, 2026 – पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात भोंदू ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण...
Continue reading
परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT आणि EDP म्हणजे काय? उन्हाळ्यात कोणता परफ्युम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती
परफ्युम ही फक्त सुगंधाची वस्तू नसून व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देणा...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हल्ल्यात भारताचे २६ नागरिक शहीद झाले होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले.
या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर ड्रोन व मिसाईल हल्ले करण्यात आले. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानने भारताच्या विविध शहरांवर लढाऊ विमानांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यातच एक JF-17 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. त्याला भारताने वेळीच लक्ष्य करून पाडले आणि त्यातील वैमानिक जिवंत पकडण्यात यश मिळवले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त
भारत-पाकिस्तानमध्ये वाढत चाललेला तणाव पाहता संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका व रशिया यांनी दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले आहे. मात्र भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड होणार नाही.
भारतीय लष्कर सध्या सर्व सीमेवर सज्ज असून पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक कारवायेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.