राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Related News
वादळाचा कहर! जानोरीमेळ गावात अवघ्या २० मिनिटांत उध्वस्त संसार; अनेकांचे संसार उघड्यावर
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
मोठा खुलासा! अहमदाबाद विमान अपघातामागे पक्ष्यांची धडक; दोन्ही इंजिन बंद, 100 हून अधिकांचा मृत्यू
दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान
अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
माध्यमातून टीआरपी वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचा टोला ही त्यांनी माध्यमांना लगावला आहे.
तर साखर कारखान्यामध्ये कोणत्याही निवडणुका या राजकीय पक्षाची नसतात.
यामध्ये सहकार म्हणून एकत्र लढतात. असेही अजित पवार म्हणाले.
तर राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आपल्याकडे कायदा हातात घेता येत नाही.
तुडवा ठोका ही लोकशाहीची पद्धत नाही. बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये चर्चा करून प्रश्न सुटतात.
यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच अस नाही तर योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल
असंही पवार यांनी म्हटलं आहे. तर नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्य हे अर्थहीन असल्याचं ते म्हणाले.
Read Also : https://ajinkyabharat.com/ahmedabadamadhyay-air-india-aircraft-abusive-237-migrant-riders/