राज ठाकरे – फडणवीस भेटीवर अजित पवारांचा संतुलित प्रतिसाद; “हीच महाराष्ट्राची संस्कृती”

राज ठाकरे - फडणवीस भेटीवर अजित पवारांचा संतुलित प्रतिसाद; "हीच महाराष्ट्राची संस्कृती"

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Related News

माध्यमातून टीआरपी वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचा टोला ही त्यांनी माध्यमांना लगावला आहे.

तर साखर कारखान्यामध्ये कोणत्याही निवडणुका या राजकीय पक्षाची नसतात.

यामध्ये सहकार म्हणून एकत्र लढतात. असेही अजित पवार म्हणाले.

तर राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आपल्याकडे कायदा हातात घेता येत नाही.

तुडवा ठोका ही लोकशाहीची पद्धत नाही. बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये चर्चा करून प्रश्न सुटतात.

यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच अस नाही तर योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल

असंही पवार यांनी म्हटलं आहे. तर नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्य हे अर्थहीन असल्याचं ते म्हणाले.

Read Also : https://ajinkyabharat.com/ahmedabadamadhyay-air-india-aircraft-abusive-237-migrant-riders/

Related News