पातूर प्रतिनिधी — पातुर तालुक्यातील सस्ती येथील महावितरण सबस्टेशनचा कारभार ढेपाळला असून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांमध्ये जोर धरत आहे. पांगरताटी येथील शेतकरी किशोर शिवराम जाधव, गौतम रामलाल दुग्गड आणि प्रकाश नामदेव चोंडकर यांच्या शेतातील बंद पडलेल्या डीपीबाबत वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 06 जून 2025 पासून सस्ती सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांगरताटी शिवारात शेतकरी जाधव, दुग्गड आणि चोंडकर यांच्या तीनही डिप्या पावसाळ्यातील पाण्यात वाहून गेल्या होत्या. तेव्हापासून त्या दुरुस्त न झाल्याने शेतजमिनींना सिंचन मिळत नाही. गहू, हरभरा यांसारख्या हंगामी पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे पिक पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत आहे.
शेतकरी बांधवांनी अनेकवेळा सस्ती येथील महावितरण कार्यालयात अर्ज, निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहाय्यक अभियंता आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
Related News
Akola News: अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील रेणुका दिनेश केकन हिने देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून ऐतिहासि...
Continue reading
शेतकऱ्यांचा विश्वासघात; राजू शेट्टींचा सरकारवर टीका
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी योजना काही शेतकऱ्यांना दिलासा देणारी वाटली,...
Continue reading
वाडेगाव: केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध वाडेगाव बस स्थानक परिसरात बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी सकाळी सुमारे ११ वाजता शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्य...
Continue reading
पुन्हा भगवं वादळ घोंघावणार? मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांन...
Continue reading
पातूर : पातूर तालुक्यातील सस्ती गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, विद्यार्थ्यासह ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील म...
Continue reading
पाणीपुरवठा, रस्ते आणि विकासाच्या कामांवर बोलणाऱ्या आलेगाव ग्रामपंचायतीत सध्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निलंबित ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून जनसुविध...
Continue reading
लोणार (प्रतिनिधी): लोणार तालुक्यातील खळेगाव येथील शेतरस्ता गेल्या दोन वर्षांपासून अडथळ्यात असल्याने स्थानिक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. ‘नंबर धुऱ्याचा’ म्हणून ओळखला जाणारा हा शे...
Continue reading
पातूर तालुक्यातील राहेर गावातून गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. विकास सदाशिव पाचपोर यांनी केंद्रीय रिजर्व पोलीस बल (CRPF) मध्ये निवड...
Continue reading
https://youtu.be/ngiIuAIHKgo?si=d88T8ezAiv_dSYcoकृषी मंत्र्यांना खुले पत्र !बळीराजाच्या छाताडावर मग्रुरीचे बूटदत्तामाम...
Continue reading
अकोट: विदर्भातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेवर होत असलेले धोके...
Continue reading
पातूर तालुका प्रतिनिधी – पातूर तालुक्यातील सावरगाव परिसरातील विहिरी सर्वेक्षणात कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक...
Continue reading
तेल्हारा – तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी हवामान बदलामुळे झालेले मोठे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन पीक विमा भरपाई मंजूर करण्याची मागणी ...
Continue reading
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “आम्ही शेतकरी आहोत… आमच्या शेतातली पिकं पाण्याअभावी सुकत आहेत. सावकाराकडील कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे काहीच मार्ग नाही. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. शासनानेच आम्हाला गळफास घेण्याची परवानगी द्यावी किंवा आम्ही का गळफास घेतो हे नाटकाच्या माध्यमातून सस्ती सबस्टेशनसमोर आंदोलन करून दाखवू,” असा थेट इशारा कापकर यांनी दिला.
सस्ती सबस्टेशनच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आगामी काळात या आंदोलनाचे रूप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shirla-village-panchayats-chief-nalyachi-malfunction/