अकोट: वारकरी संतांनी सुरू केलेल्या पंढरपूर वारीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे.
पंढरपूर वारी म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर, असे उद्बोधक विचार संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव
व प्रख्यात कीर्तनकार हभप रविंद्र वानखडे यांनी व्यक्त केले.
Related News
पावसाळ्यात मासे खाताय? सावधान! ‘हे’ मासे खाल्ल्यास होऊ शकतो फूड पॉइझनिंगचा धोका
अमेरिका-इराण युद्धात भारताचं मोठं नुकसान? चाबहार बंदरावर हल्ल्याचा दावा, नवा भू-राजकीय पेच
‘सिया संस्कारी आहे असं सांगितलं होतं’; केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी
तुम्ही पित असलेलं दूध खरंच शुद्ध आहे का? ‘या’ 5 घरगुती चाचण्यांनी लगेच ओळखा भेसळ
साखर विसरा! घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्रूट सोडा, उन्हाळ्यात मिळेल जबरदस्त ताजेपणा
‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडे’; सुषमा अंधारे यांचं मोठं वक्तव्य
धाराशिवमध्ये नवा राजकीय ट्विस्ट! ओमराजे निंबाळकर-कैलास पाटील एकाच बॅनरवर, चर्चांना उधाण
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं हे लोकशाहीचं लक्षण’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेकचं वक्तव्य चर्चेत
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
विदर्भातील देहू कालवाडी येथे झालेल्या संत तुकाराम बीज सोहळ्यातील कीर्तनात ते बोलत होते.
वारी म्हणजे भक्तीचा प्रवाह
“पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थात ||
” या संत तुकोबारायांच्या अभंगाचा भावार्थ सांगताना ते म्हणाले की,
वारी करताना एकादशीचे व्रत आणि अखंड नामस्मरण हे वारकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ असतात.
विठुरायाचे नाव कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे कारण आहे.
वारी म्हणजे भक्तीचा सोहळा, संस्कृतीचा वारसा आणि संतपरंपरेचा गौरव.
जसे सासरी गेलेली मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुर असते,
तसेच वारकरी आपल्या मायबाप विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतो.
नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या निनादात, रिंगण, फुगडी आणि भारुडे करीत भक्तीचा हा प्रवाह अखंड वाहत असतो.
ही परंपरा मराठी सांस्कृतिक वारशाचे अनमोल वैभव आहे, असा विचार त्यांनी मांडला.
श्रद्धासागर आणि कालवाडी तीर्थस्थळाचे स्मरण
दरम्यान, श्रद्धासागर व कालवाडी ही तीर्थस्थळे उभारणारे थोर व्यक्तिमत्व
वै. पंजाबराव हिंगणकर यांचे पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या हस्ते हभप
रविंद्र महाराज वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

