अकोट: वारकरी संतांनी सुरू केलेल्या पंढरपूर वारीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे.
पंढरपूर वारी म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर, असे उद्बोधक विचार संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव
व प्रख्यात कीर्तनकार हभप रविंद्र वानखडे यांनी व्यक्त केले.
Related News
Post Office Kisan Vikas Patra (KVP) Scheme : फक्त 9 वर्षात तुमचे पैसे दुप्पट करणारी सुरक्षित गुंतवणूक!
liver खराब होण्याची 5 धोकादायक लक्षणे तुम्ही दुर्लक्ष करू नयेत!
सकाळी Banana खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे – वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक!
Raghav Chadha Viral Video : 5 कारणं का लोकांच्या मनावर पडला प्रभाव
Diabetes ची त्वचेवरची 6 चेतावणी चिन्हे – लवकर ओळखणे आवश्यक!
EPF खात्यातील मोठी समस्या संपवा: जन्मतारीख बदलण्यासाठी 5 अत्यावश्यक स्टेप्स
मोठी बातमी: भटक्या कुत्र्यांसाठी Mika Singh ची दर्यादिली, 10 एकर जमीन दान करण्याचा ऐतिहासिक निर्णय
ATM मधून पैसे काढणे झाले महाग: SBI च्या 7 नवीन नियम जाणून घ्या!
Green Cardamom and Black Cardamom : जाणून घ्या 7 अद्भुत फरक
Saag चविष्ट होणारच! ‘या’ 5 जबरदस्त टिप्समुळे घरचा साग बनेल अप्रतिम
In America कारलीची किंमत पाहून हैराण व्हाल : 5 महागलेले रहस्ये उघडकीस!
₹3000 under the Ladki Bahin Scheme : 5 महत्वाच्या गोष्टी जे प्रत्येक महिलेला माहित असाव्यात!
विदर्भातील देहू कालवाडी येथे झालेल्या संत तुकाराम बीज सोहळ्यातील कीर्तनात ते बोलत होते.
वारी म्हणजे भक्तीचा प्रवाह
“पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थात ||
” या संत तुकोबारायांच्या अभंगाचा भावार्थ सांगताना ते म्हणाले की,
वारी करताना एकादशीचे व्रत आणि अखंड नामस्मरण हे वारकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ असतात.
विठुरायाचे नाव कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे कारण आहे.
वारी म्हणजे भक्तीचा सोहळा, संस्कृतीचा वारसा आणि संतपरंपरेचा गौरव.
जसे सासरी गेलेली मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुर असते,
तसेच वारकरी आपल्या मायबाप विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतो.
नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या निनादात, रिंगण, फुगडी आणि भारुडे करीत भक्तीचा हा प्रवाह अखंड वाहत असतो.
ही परंपरा मराठी सांस्कृतिक वारशाचे अनमोल वैभव आहे, असा विचार त्यांनी मांडला.
श्रद्धासागर आणि कालवाडी तीर्थस्थळाचे स्मरण
दरम्यान, श्रद्धासागर व कालवाडी ही तीर्थस्थळे उभारणारे थोर व्यक्तिमत्व
वै. पंजाबराव हिंगणकर यांचे पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या हस्ते हभप
रविंद्र महाराज वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
