दरवर्षी पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर भाजी बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वाढतात.
यावर्षी सुद्धा पावसाळा प्रारंभ होताच भाजी बाजारात भाज्यांचे दर
मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
त्यामुळे नागरिकांना भाज्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागत असून
पावसाळा संपेपर्यंत ही भाज्यांची दरवाढ कायम राहणार असल्याचे दिसून येते.
पावसाळ्याच्या तोंडावर बाजारात भाज्यांची आवक कमी होते.
त्यामुळे दरवर्षी भाज्यांचे दर वाढतात.
यावर्षी अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही मात्र भाज्यांची आवक कमी झाल्याने
भाज्यांचे दर वाढलेले आहेत.
पावसाळ्या व्यतिरिक्त एका कुटुंबाचा आठवड्याचा भाजीपाला ३०० ते ४०० रुपयांमध्ये होतो.
त्यासाठी आता आठवड्याला ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.
पावसाळा संपेपर्यंत ही परिस्थिती राहणार आहे.
पावसाळ्यात पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक परिस्थितीमुळे
भाजीपाला लवकर खराब होतो किंवा सडतो.
आधीच उत्पादन कमी त्यात भाजीपाला खराब होत असल्याने
बाजारातील आवक कमी होते परिणामी भाव वाढतात.
सध्याच्या परिस्थितीत भाजी बाजारामध्ये बटाटे ४० रुपये किलो, वांगी ६० रुपये किलो,
टोमॅटो ८० रुपये किलो, पालक ८० रुपये किलो, घोळ, चवळी, ६० रुपये किलो,
गवार ८० रुपये किलो, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो,
लसन २०९ रुपये किलो, अद्रक १६० रुपये किलो, कोथिंबीर २०० रुपये किलो,
गंगाफळ ४० रुपये किलो, फूलकोबी ८० रुपये किलो, पत्ताकोबी ६० रुपये किलो,
मेथी ८० रुपये किलो, शेपू ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो,
गिलके ८० रुपये किलो, असे पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव आहेत.
भाज्यांना पर्याय नाही आणि रोजच्या दोन वेळेच्या जेवणात भाज्या लागतातच.
त्यामुळे दर वाढले तरी नागरिकांना
दररोज पालेभाज्या व फळभाज्या विकत घ्याव्या लागत आहेत.
जांभूळ बाजारात दाखल
दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी बाजारात जांभूळ या फळाचे आगमन होते.
यावर्षी सुद्धा बाजारात जांभूळ दाखल झाले आहेत.
आंबट, गोड, तुरट अशा मिश्र चवीचे जांभूळ आरोग्यासाठी फायदेकारक मानले जाते.
विशेष करून शुगरच्या रुग्णांसाठी जांभूळ फायदेकारक असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे जांभूळांना बाजारात मोठी मागणी असते.
यावर्षीही जांभूळ बाजारात दाखल होताच मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
रानभाज्यांची प्रतीक्षा
पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर दरवर्षी बाजारपेठेमध्ये
विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी येतात.
या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारक मानल्या जातात.
पावसाळ्याच्या दोन महिन्यातच रानभाज्या मिळतात.
त्यामुळे बरेच नागरिक ह्या रानभाज्या खरेदी करतात.
अकोल्यात रानभाज्यांचा महोत्सव सुद्धा साजरा केला जातो.
पावसाळा प्रारंभ झाल्याने आता अनेक नागरिक या रानभाज्यांची प्रतीक्षा करीत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/550-haj-pilgrims-die-due-to-heat-temperature-in-mecca-saudi-reaches-52-degrees-celsius/