नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौधरी यांनी “तुम्ही आमचं पाणी बंद केलं, तर आम्ही तुमचा श्वास थांबवू”
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
अशी थेट धमकी दिली आहे. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
हाफिज सईदच्या शैलीत धमकी
पाकिस्तानी अधिकाऱ्याची भाषा ही लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदसारखीच असल्याचं स्पष्ट होत असून,
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तान दहशतवादाच्या भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.
भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, पाकिस्तानच्या या वर्तनावर जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतरची पार्श्वभूमी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 22 मिनिटात ‘ऑपरेशन सिंदूर’ करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
त्यानंतर भारताने सिंधू पाणी कराराच्या अंमलबजावणीत मोठे बदल करत पाकिस्तानकडे जाणारे
पाणी रोखण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवरच ही वादग्रस्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर संताप
पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, ट्विटर,
फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर “#PakistanThreat”, “#WaterTerrorism” हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
भारतीय नागरिकांनी पाकिस्तानच्या उघड दहशतवादी समर्थनावर जोरदार टीका केली आहे.
भारताची ठाम भूमिका
भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत. संवाद
आणि दहशतवाद एकत्र चालत नाहीत.” त्यामुळे पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांना
समर्थन दिलं जात असताना कोणतीही माफीशीर भूमिका घेतली जाणार नाही, हे ठामपणे सांगण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/aryan-khan-turunungat-fakt-fan-aani-paniyavar/