अकोला –
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा परिणाम अकोल्याच्या पर्यटकांवरही झाला असून, अकोल्यातील ३१ पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
हे सर्व पर्यटक १८ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान ‘गुरुमाऊली टूर्स’च्या माध्यमातून काश्मीर दौऱ्यावर गेले होते.
मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास तात्काळ थांबवला आहे.
स्थानीय नागरिकांनी दिला आधार, पर्यटक सुखरूप
सध्या हे पर्यटक श्रीनगरमध्ये थांबले असून, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना
सहकार्य व मदत केली असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप आहेत,
अशी माहिती मिळाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, हे पर्यटक मिळेल त्या मार्गाने अकोल्यात परत यायला इच्छुक आहेत.
परतीसाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी
पर्यटकांनी लवकरात लवकर अकोल्यात परतण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.
त्यासाठी यंत्रणांनी तात्काळ हालचाली करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chorla-stuck-stolen/