‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताकडून पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी एअर स्ट्राईक

ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारताकडून पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी एअर स्ट्राईक

Operation Sindoor Updates : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमधील नऊ ठिकाणे उद्ध्वस्त करत, भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. या कारवाईमुळे देशात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, दहशतवाद्यांना कठोर संदेश देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने उत्तर दिलं आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. हे हल्ले पहाटे 1:30 च्या सुमारास बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये झाले. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकांचा जीव गेला होता.

भारतीय वायुसेनेने हे हल्ले करण्यापूर्वी देशभरात 300 ठिकाणी मॉक ड्रिल केले होते. यानंतर, त्यांनी थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारले. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. “या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही,” असा इशारा भारताने दिला होता. त्यानुसार, कारवाई करत भारत सरकारने आपली जबाबदारी पूर्ण केली आहे.

पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल लवकरच आणखी माहिती दिली जाईल. “ऑपरेशन सिंदूर’बद्दल लवकरच माहिती दिली जाईल,” असे पीआयबीने म्हटले आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीमध्ये हल्ला केला होता. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Related News

भारताने या कारवाईद्वारे दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. तो संदेश असा आहे की, “दहशतवादी कुठेही लपले तरी, भारत त्यांना शोधून मारणार.” ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या धैर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या कारवाईमुळे भारताची प्रतिमा जगात आणखी उंचावली आहे. भारतीय वायुसेनेने दाखवून दिले आहे की, ते आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या कारवाईमुळे देशातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त एक लष्करी कारवाई नाही, तर दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कारवाईमुळे भारताने जगाला दाखवून दिले आहे की, तो दहशतवादाला कधीही सहन करणार नाही.

 

 

Related News