पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) आणि बहावलपूरपर्यंत
पसरलेल्या दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
भारतीय सैन्याने मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही कारवाई केली असून, यामध्ये नऊ ठिकाणी लक्ष्य भेदण्यात आले आहेत.
या हल्ल्यांदरम्यान भारताने पाक सैन्याच्या कोणत्याही अधिकृत स्थळांना लक्ष्य न करता थेट
दहशतवाद्यांच्या तळांवरच स्ट्राइक केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही रणनीती भारताच्या धोरणात्मक परिपक्वतेचं
आणि जबाबदारपणाचं उदाहरण मानली जात आहे. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत,
ज्यात पाकिस्तानी नागरिक आश्चर्य आणि भीतीने प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही व्हिडीओत गाडी चालवत असलेले
नागरिक अचानक क्षेपणास्त्र कोसळल्याचं दृश्य टिपताना ऐकू येतात, “काय झालं… व्हिडीओ बनवा…”
भारतीय हवाई दलानेही यावेळी गस्त वाढवून सीमेवर सतर्कता अधिक तीव्र केली आहे. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील
सुरक्षा बैठका सुरू असून याच काळात देशभरात ३०० ठिकाणी मॉक ड्रिलदेखील राबवली जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे सीमावर्ती भागात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात आली
असून कारवाईचा उद्देश फक्त दहशतवाद्यांचा नायनाट हा असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/railway-pravashansathi-mahatwachi-baatmi/