भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईनंतर आज भारतीय सेनेकडून
आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली.
Related News
अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी
अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली
अकोल्यात शिवसेनेकडून सैनिकांना सलाम, लाडू वाटून जल्लोष
“ही कारवाई थांबू नये…” – ऑपरेशन सिंदूरवर शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांची भावुक प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
“२२ एप्रिल रोजी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) या पाकप्रशिक्षित दहशतवादी संघटनेने
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला.
मुंबई २६/११ नंतरचा हा सर्वात गंभीर हल्ला होता,” असे त्यांनी सांगितले.
विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलं की पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘टीआरएफ’ या गटाने घेतली असून,
या गटाचा थेट संबंध लष्कर-ए-तोयबाशी आहे. “हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांशी पाकिस्तानचे थेट संबंध उघड झाले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की भारताच्या गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानमधून पुन्हा भारतावर हल्ला होण्याची माहिती आधीच मिळाली होती.
त्यामुळे अशा हल्ल्यांना वेळेत रोखणे गरजेचे होते. “काश्मीरमधील विकास थांबवण्यासाठी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी हे कट कारस्थान रचले गेले होते,” असेही ते म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले नसून, दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणांना देखील स्पष्ट संदेश दिला आहे.