ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?

ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात अलर्ट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अर्धसैनिक दलांच्या प्रमुखांना त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की,

Related News

सुट्टीवर गेलेले जवान तात्काळ सेवा स्थळी परतावेत, तसेच सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्यात यावी.

गृहमंत्री अमित शाह हे जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा

आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी सतत संपर्कात असून,

सीमावर्ती नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी बंकर सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शाह यांनी म्हटलं की, “ऑपरेशन सिंदूर हे निर्दोष भारतीयांच्या हत्येला दिलेले कठोर उत्तर आहे.

मोदी सरकार देशावर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला तितक्याच ताकदीनं उत्तर देणार आहे.

भारत दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून,

ऑपरेशन सिंदूरबाबतचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे. बैठकीत सुरक्षा विषयक समिती (CSC) सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/mehi-mell/

Related News