पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अर्धसैनिक दलांच्या प्रमुखांना त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की,
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
सुट्टीवर गेलेले जवान तात्काळ सेवा स्थळी परतावेत, तसेच सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्यात यावी.
गृहमंत्री अमित शाह हे जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा
आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी सतत संपर्कात असून,
सीमावर्ती नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी बंकर सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शाह यांनी म्हटलं की, “ऑपरेशन सिंदूर हे निर्दोष भारतीयांच्या हत्येला दिलेले कठोर उत्तर आहे.
मोदी सरकार देशावर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला तितक्याच ताकदीनं उत्तर देणार आहे.
भारत दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून,
ऑपरेशन सिंदूरबाबतचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे. बैठकीत सुरक्षा विषयक समिती (CSC) सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mehi-mell/