नवी दिल्ली | प्रतिनिधी
२२ एप्रिल रोजी पल्लनगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी
तळांवर निर्णायक हवाई कारवाई केली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं असून,
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हे नाव निश्चित केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
‘सिंदूर’ हे नाव फक्त वैवाहिक स्त्रियांच्या मांगातील सौभाग्याचं प्रतीक नाही,
तर त्या स्त्रिया ज्या या हल्ल्यामुळे विधवा झाल्या – त्यांचा सन्मान, आणि त्यांच्या अश्रूंना दिलेला न्याय
असाही संदेश हे नाव देते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले,
ज्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्य अड्डे होते.
या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. लेफ्टनंट विनय नारवाल यांच्या नवविवाहित पत्नी
हिमांशी आणि पर्यटक पल्लवी रावच्या व्हायरल झालेल्या दृश्यांनी देशाच्या भावना हलवल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे त्या आणि इतर विधवा महिलांना काही प्रमाणात न्याय मिळाला आहे, असं अनेक पीडित कुटुंबांनी म्हटलं आहे.
भारतीय लष्कराने जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये ‘Operation Sindoor’ हे नाव ठळक अक्षरात असून,
त्यातील ‘O’ सिंदूराच्या वाटीसारखं दाखवण्यात आलं आहे. खाली मजकूर आहे – “Justice is served. जय हिंद.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पल्लनगाम हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर झालेला आघात आहे.
देश शत्रूंच्या कोणत्याही कारवायेला गप्प बसणार नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शिक्षा होणारच.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-ankhi-kharchi-persity/