उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दोस्ती पक्की आहे.
उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत, शिवसेना खरी कोणाची? हे न्यायालयाने आधीच सिद्ध केलं आहे.
आम्ही 80 जागा लढलो 60 जागा जिंकलो, ते फक्त 20 जागाच जिंकले, त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही,
ते काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत, असा हल्लाबोल सामंत यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेब यांच्यासोबत गद्दारी केली.
सौगात हा मोदींचा उपक्रम आहे. यांनी फेक नरेटीव्ही सेट केला आहे.
आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही, यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोझर पाठवला.
राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले. यांनी जे कृत्य केले ते पुसले जाणार नाहीत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनामध्ये प्रत्येक घोषणेवर चर्चा झाली आहे.
आम्ही आमचा अजेंडा पाच वर्षांमध्ये पूर्ण करणार आहोत.
यांना जे जमले नाही ते आम्ही केले आहे. गिरीश महाजन यांना एका प्रकरणात यांनी अटकवण्याचा प्रयत्न केला.
नुसती विधान भवनात येऊन पत्रकार परिषद घेतात.
यांनी आधी काम पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.