२०२४ ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे.
एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
इंडिया आघाडीला विरोधात बसावे लागले आहे.
अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत
मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की,
अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल,
तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे.
त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आत्ता स्थापन झालेल्या
मोदी सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे.
त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत,
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना घुसखोर म्हटले आहे.
राहुल पुढे म्हणाले की, आम्ही पाठीमागे हात बांधून लढलो.
भारतीय जनतेला, गरीब जनतेला, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहीत होते.
न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना हे सर्व विरोधकांसाठी बंद होते.
त्यांनी गेली १० वर्षे अयोध्येच्या मुद्द्यावर प्रचार केला परंतु त्यांना अयोध्येने नाकारले.
भारतीय राजकीय विश्लेषकांनी एनडीए आघाडीच्या स्थिरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यंदा एनडीए आघाडी कमकुवत असून सत्ता टिकवण्यासाठी
भाजपला छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे
असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.