२०२४ ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे.
एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
इंडिया आघाडीला विरोधात बसावे लागले आहे.
अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत
मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की,
अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल,
तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे.
त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आत्ता स्थापन झालेल्या
मोदी सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे.
त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत,
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना घुसखोर म्हटले आहे.
राहुल पुढे म्हणाले की, आम्ही पाठीमागे हात बांधून लढलो.
भारतीय जनतेला, गरीब जनतेला, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहीत होते.
न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना हे सर्व विरोधकांसाठी बंद होते.
त्यांनी गेली १० वर्षे अयोध्येच्या मुद्द्यावर प्रचार केला परंतु त्यांना अयोध्येने नाकारले.
भारतीय राजकीय विश्लेषकांनी एनडीए आघाडीच्या स्थिरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यंदा एनडीए आघाडी कमकुवत असून सत्ता टिकवण्यासाठी
भाजपला छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे
असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.