🔹 मुंबई | विशेष प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे सध्या
राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब
ठाकरे यांनी मदत केली होती, असा उल्लेख करून राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
या पुस्तकावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत असून चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे.
“पुस्तकाचं नाव ‘नरकातला स्वर्ग’ न ठेवता ‘नरकातला राऊत’ असं असायला हवं होतं”, असा घणाघात त्यांनी केला.
इतकंच नव्हे, तर “मी संजय राऊतांना पत्र लिहून पुस्तकाचं नाव बदलण्याची मागणी करणार आहे”, असंही बावनकुळे म्हणाले.
यापूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका करत “गटारातील अर्क असं नाव त्या लेखकाला शोभेल”,
असं वक्तव्य केलं होतं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावत म्हटलं होतं की,
“कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं वय माझं आता राहिलेलं नाही.”
राजकीय वर्तुळात संजय राऊतांच्या पुस्तकातील मजकूर आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया यामुळे
वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील राजकीय घडामोडींवर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-bharatachi-tayari-anakhi-aggressor/