मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशाल मोर्चा काढत सरकारला थेट इशारा दिला —
Related News
वैष्णवी हगवणेप्रमाणेच तिची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे
हिला देखील गंभीर अत्याचारांना सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
मयुरीच्या आईने नोव्हेंबर 2024 मध्य...
Continue reading
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
त्...
Continue reading
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
“जर सरकार बधत नसेल, तर प्रहारच्या मशालीचा उजेड थेट विधानसभेत पोहोचेल!”
मुर्तीजापुर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश ‘अप्पा’ पिंपळे यांच्या जनसंपर्क
कार्यालयावर रात्री साडेअकराच्या सुमारास आक्रमक मोर्चा दाखल झाला. हातात पेटलेल्या मशाली,
निळे दुपट्टे, आणि “शेतकऱ्यांचा जयजयकार – सरकारला धक्का देणार!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रहारची ठाम मागणी:
प्रहार तालुका अध्यक्ष अक्षय अनिल वैराळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
-
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी
-
पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून द्यावा
-
दिव्यांग बांधवांना दरमहा ₹६००० मानधन मंजूर करावे
‘हे सरकार झोपले आहे!’ – प्रहारचा सवाल
“दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्याला अजूनही झापडं लागली आहेत!
निवडणुकीआधी ‘शेतकऱ्यांचे पुत्र’ म्हणून मिरवणारे आज गप्प का?” असा थेट सवाल प्रहारने उपस्थित केला.
यावेळी अक्षयभाऊ वैराळे, नारायणभाऊ लोखंडे, संदीप चव्हात, प्रल्हाद मालळकर, पुडलिंग धंदरे,
तुषार लोखंडे, रामेश्वर खुळे, पंकज आंधळे, विठ्ठल घुगे, रणजीत लोखंडे यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडेकोट बंदोबस्तात आंदोलन
मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणेदार अजित जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश सूर्यवंशी, आशिष शिंदे आणि पवार साहेब यांनी भक्कम पोलीस बंदोबस्त ठेवला.
महात्मा फुले व आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र
प्रहारने स्पष्ट केलं की ही लढाई “शेतकऱ्याच्या जिवाची आणि दिव्यांगाच्या हक्काची” असून येत्या
महात्मा फुले जयंती (११ एप्रिल) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) या काळात आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.
“हातात मशाल, ओठांवर घोषणा आणि मनात अन्यायाविरुद्धची चीड – प्रहारचं हे आंदोलन सरकारला झोपेतून जागं करणार!”
Read Also :