प्रतिनिधी, ठाणे:
मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेल्या लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
दोन्ही लोकल 75 किमी/ताशी वेगाने धावत होत्या, आणि दरम्यानचे अंतर फक्त 0.75 मीटर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
दोन्ही लोकल एकमेकांना धडकल्या नाहीत, मात्र दरवाज्याजवळ उभ्या प्रवाशांची बॅग व हात
बाहेर आल्याने बॅगांची गुंतागुंत झाली आणि प्रवासी खाली पडले असावेत, असा प्रारंभिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अहवालातील प्रमुख बाबी:
दिवा ते मुंब्रा दरम्यान सकाळी 9.30 वाजता घटना
दोन्ही लोकल दरवाज्यात उभ्या प्रवाशांची धडक
सीसीटीव्हीमध्ये दृश्य अस्पष्ट
फक्त काही सेकंदात घटना घडली
जखमी आणि मृतांची माहिती:
एकूण 13 जण जखमी, रुग्णालयात दाखल
मृतांमध्ये एक पोलीस कर्मचाऱ्यासह 4 जणांचा समावेश
राहुल संतोष गुप्ता (28), दिवा
सरोज केतन (23), उल्हासनगर
मयूर शाह (44)
मच्छिंद्र मधुकर गोतरणे (31), पोलीस कॉन्स्टेबल
पुष्पक एक्सप्रेसचा अपघाताशी कोणताही संबंध नाही
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दरवाज्यात उभे राहण्यापासून आणि बाहेर हात, बॅग न काढण्याचे आवाहन केले आहे.
स्वप्नील निला (मध्य रेल्वे माहिती अधिकारी) यांनी घटनाबाबत सविस्तर माहिती दिली.
सुरक्षित प्रवासासाठी नियम पाळा – रेल्वे प्रशासनाचा इशारा.