मुंबई, १० जून — मुंब्रा लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
सरकार भाडे न वाढवता AC लोकल ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे.
यासाठी विशेष मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.
Related News
फडणवीस म्हणाले, “कालच्या घटनेतून शिकावं लागेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत अडीच तास चर्चा झाली.
दरवाजे लावण्याचं काम सुरु आहे, व्हेंटिलेशनसाठी योग्य डिझाईन तयार आहे.”
यासोबतच पब्लिक ट्रान्सपोर्टची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
सरकारी कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट देण्यात आला असून खाजगी कार्यालयांसाठीही मार्ग काढण्याचा विचार सुरु आहे.
दरम्यान, मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अद्याप औपचारिक
शोकसंवेदना किंवा मदतीची घोषणा झालेली नाही, यावरून जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahavitaran-chi-sarvahis-line-takanyasathi-hot-ahe-vrikshanchi-kattal/
