मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची
सेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिम
Related News
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
महावितरणने केली मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
विदर्भ प्रो T20 लीगमध्ये NECO मास्टर ब्लास्टरच्या 9 गडी राखून विजयात आर्यन मेश्राम चमकदार – सामना विजेता घोषित
वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; मात्र विमा कंपनीचे दुर्लक्ष
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या तेराव्या कथासंग्रहांचे प्रकाशन संपन्न
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड
स्थानकात इंजिन फेल झाल्याने अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या
यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल
होताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे
मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे
येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम
रेल्वेवरील केळवे रोड स्थानकादरम्यान इंजिन फेल झाले आहे.
त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा
झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेसही पालघर
स्थानकावर रखडली आहेत. केळवे रोड स्थानकात झालेल्या
बिघाडामुळे पालघर ते विरार, आणि पालघर ते चर्चेगेट या दिशेने
धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत आहेत.
दरवर्षी दिवाळी आणि छट पुजेसाठी लाखो उत्तर भारतीय मुंबईतून
उत्तर प्रदेशला जात असतात. मुंबईहून उत्तर प्रदेशात
जाण्यासाठीच्या अनेक गाड्या या पश्चिम रेल्वेमार्गे धावतात. यामुळे
रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले
आहे. उधना ते गोरखपूर यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात
आल्या आहेत. २५ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत या विशेष
गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केळवे स्थानकात झालेल्या
तांत्रिक गोंधळामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क लागला
आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना
त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशी संतप्त झाले
आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/12-fishermen-from-tamil-nadu-caught-by-sri-lankan-navy/