मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची
सेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिम
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड
स्थानकात इंजिन फेल झाल्याने अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या
यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल
होताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे
मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे
येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम
रेल्वेवरील केळवे रोड स्थानकादरम्यान इंजिन फेल झाले आहे.
त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा
झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेसही पालघर
स्थानकावर रखडली आहेत. केळवे रोड स्थानकात झालेल्या
बिघाडामुळे पालघर ते विरार, आणि पालघर ते चर्चेगेट या दिशेने
धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत आहेत.
दरवर्षी दिवाळी आणि छट पुजेसाठी लाखो उत्तर भारतीय मुंबईतून
उत्तर प्रदेशला जात असतात. मुंबईहून उत्तर प्रदेशात
जाण्यासाठीच्या अनेक गाड्या या पश्चिम रेल्वेमार्गे धावतात. यामुळे
रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले
आहे. उधना ते गोरखपूर यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात
आल्या आहेत. २५ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत या विशेष
गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केळवे स्थानकात झालेल्या
तांत्रिक गोंधळामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क लागला
आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना
त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशी संतप्त झाले
आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/12-fishermen-from-tamil-nadu-caught-by-sri-lankan-navy/