अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ग्रामपंचायतीच्या कचरा पेट्या
Related News
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
विद्यमान सरपंचांच्या घरी धूळ खात पडून आहेत. सहा महिन्यांनंतरही या पेट्यांचे अद्यापही वितरण झालेले नाही.
ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, “मोखा आणि जानोरीमेळ या दोन्ही
गावांमध्ये कचरा पेट्यांचे वाटप होणे बाकी आहे. जानोरीमेळसाठी स्वतंत्र घंटागाडी
आणण्याची प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे.
येत्या २५ ते २७ एप्रिलदरम्यान पेट्यांचे घरोघरी वितरण केले जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
घंटागाडी वापराबाहेर, अपंग निधीही रखडला
सदर ग्रामपंचायतीने आणलेली घंटागाडीही सद्यस्थितीत निष्क्रिय आहे.
यासंदर्भात ग्रामसेवकांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीचा एक
कर्मचारी अपघातग्रस्त झाल्यामुळे या वितरण प्रक्रियेला विलंब झाला.”
तसेच, अपंग नागरिकांसाठी असलेला शासनाचा निधीही अद्याप वितरित झालेला नाही.
या निधीचे वितरणही कचरा पेट्यांप्रमाणे पुढील आठवड्यातच करण्याचे आश्वासन ग्रामसेवकांनी दिले.
ग्रामस्थांमध्ये नाराजी, कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “सार्वजनिक सुविधांसाठीचा निधी
आणि साहित्य जर अशा प्रकारे ठेवून दिला जाणार असेल,
तर ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं,”
अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/avakali-pavasacha-vanisah-complex-tadakha/