नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण
बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते.
त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात कमवायला गेली आहेत.
Related News
मनभा | २७ जून २०२५ –
२५ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मनभा परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – हिंदी सक्तीच्या जीआरवरून सरकारनं मागे हटल्याचा
दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे मराठी म...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "पहिली ते...
Continue reading
मुर्तिजापूर | २९ जून २०२५ – अकोला जिल्ह्याचे नवीन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या
संतोष एन. साळुंके यांचे Vocational Instructors Teachers Association (V...
Continue reading
अकोट
एम.आय.टी.कॉलेज पुणे द्वारा आयोजित वैश्विक मूल्यादिष्ठीत परीक्षेमध्ये श्री शिवाजी विद्यालय अकोटची गौरी
गोपाल मुंडोकार हि विदर्भातून प्रथम आल्याबद्दल तिला २५ हजार रुपये रो...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज 32 लाख रुपये थकित दंड प्रकरणात अकोट तहसीलदार यांचे
कडून न्यायालयाच्या व वरिष्ठांच्या आदेशाला तहसीलसरांनी केराची टोपली दाखवली...
Continue reading
वाशिम, २९ :
वाशिम तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या अनसिंग येथील शृंगऋषी मंदिरात २९ जून
रोजी सकाळी एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडली. मंदिरातील प्राचीन कुंड...
Continue reading
पिजर प्रतिनिधी
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ज्ञानप्रकाश विद्यालय , व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल,
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जागतिक अमली प...
Continue reading
अकोला | २६ जून २०२५
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अकोला जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘MISSION उडान – व्यसनमुक्तीची एक संकल्प मोहिम’
या जनजागृती उपक्रमाचे भव्य आयोजन करण्य...
Continue reading
“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल
अकोला | राजेश्वर मंदिराच्या 'ब' वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाच...
Continue reading
दानापुर (वा)..
तेल्हारा तालुक्यातील क्रमांक एकची असलेली ग्राम पंचायत दानापुर येथे दिनांक26/06/2025 रोजी राजर्षी
शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या क...
Continue reading
थरूर यांची "ऑपरेशन सिंदूर", भारत-रशिया संबंधांवर चर्चा; काँग्रेसमध्ये वाद शिगेला
कॉंग्रेस नेते शशि थरूर सध्या रशियात खासगी दौऱ्यावर असून त्यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्...
Continue reading
मोबाईलमुळे नवरा-बायकोच्या नात्यात वितुष्ट आल्याची, वाद झाल्याच्या अनेक बातम्या
तुम्ही ऐकल्या असतील पण आपल्याच देशात एक असं गाव आहे, जिथे मोबाईलमुळे तरूणांचं लग्नच होत नाहीये.
उत्तर प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई ब्लॉकमधील नायगावचा हा भाग आहे.
नायगाव हे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारे वनगाव आहे.
येथे अविवाहित मुलांची संख्या वाढत आहे. आपल्या मुलीचे या गावातील तरूणांशी लग्न लावून द्यायला कोणीच तयार नाही.
त्याचे कारण म्हणजे मोबाईल नेटवर्कचा अभाव.
2025 साली टेक्नॉलॉजीमध्ये एवढे बदल झालेत, जग एवढं पुढे गेलं आहे तरी भारतातल्या या
नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण
बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते.
त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात पैसे कमवायला बाहेर पडली आहेत.
तरूणांचा लग्न रखडलं
या गावातील रहिवासी श्यामाबाई त्यांच्या 29 वर्षांच्या मुलाच्या लग्नामुळे चिंतेत आहेत.
खूप त्रास होतो. कोणीच आम्हाला मुलगी देत नाही. येथे नेटवर्क उपलब्ध नसल्याची मुलीच्या कुटुंबियांना चिंता असते.
फोन लागत नाही. माझ्या दोन मुलांची तर लग्न झाली, पण धाकटा मुलगा आता 29 वर्षांचा झाला तरी त्याचं लग्न जुळेना.
त्याच्या लग्नात बऱ्याच अडचणी येत आहेत. नेटवर्कच्या समस्येमुळे कोणीच त्यांच्या मुलीची
आमच्याशी सोयरीक करायला तयटार नाही, अशी समस्या श्यामाबाई यांनी सांगितली.
त्याच गावातील दुलम सिंग कुंजम यांचीही तीच तक्रार आहे. इंटरनेट कनेक्शन नाही,
त्यामुळे कोणीही मुलगी देऊ इच्छित नाही. ही समस्या प्रत्येकाला सतावत आहे.
आम्ही लग्नासाठी मुलगी शोधत आहोत, पण कोणीच या गावात मुलगी द्यायला तयार नाही.
आम्ही आमच्या मुलीशी कसे बोलणार? प्रत्येक पालकांचा हा सवाल आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, प्रसूतीच्या वेळी रुग्णवाहिका बोलावण्यासाठीही लांब जावे लागते.
‘रिचार्ज तर होतं पण फोन वापरण्यासाठी दोन -दोन किलोमीटर करावी लागते तंगडतोड
नेटवर्क नसल्यामुळे गावातील तरुण सर्वाधिक संतप्त आणि नाराज आहेत. 29 वर्षीय चैतालाल उईके यांच्या सांगण्यानुसार,
गावात इथे नेटवर्क नाही आणि आजच्या काळात मोबाईलशिवाय आयुष्य चालू शकत नाही. सर्वत्र नेटवर्क असावे.
मोबाईल रिचार्ज करतो आम्ही पण तो वापरण्यासाठी दोन -दोन किलोमीटर तंगडतोड करावी लागते.
मुलंही ऑनलाईन शिकू शकत नाहीत. एखाद्याला इमरजन्सीमध्ये आमच्याशी बोलण्याची गरज भासली,
कुणाचा मृत्यू झाला तरी इथे फोन येणार नाही. लोक तक्रार करतात, तेव्हा ते (अधिकाी) म्हणतात की हे फॉरेस्ट
डिपार्टमेंटचे गाव असेल तर नेटवर्तक येऊ शकणार नाही. बांधकाम होऊ शकणार नाही. ते बांधले जाणार नाही.
बीएसएनएल कडून लावण्यात येणार टॉवर
सुमारे 650 लोकसंख्या असलेल्या या गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षकांचे काम रखडते.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक रजनीश कुमार सिंह यांनी सांगितले की,
केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कव्हरेज नसलेल्या गावांसाठी बीएसएनएल टॉवर्स बसवत आहे.
काही दिवसांपूर्वी चार गावांमध्ये टॉवर बसवण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात या गावाचे नाव येऊ शकते, असे त्यांनी नमूद केलं.
Read more news here :https://ajinkyabharat.com/akola-chachaya-shop/