“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया

"मीही मेलो असतो तर..."; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी

तळांवर मंगळवारी रात्री जोरदार हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू

झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर मसूद अजहरची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली असून,

Related News

“मीही मेलो असतो तर बरं झालं असतं,” असं तो म्हणाला असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

भारतीय हवाई दलाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, मुझफ्फराबाद, कोटली,

बाग (PoK) आणि बहावलपूरमधील मुरीदके, अहमदपुरा शार्किया (पाकिस्तान) येथे दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला चढवला.

या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाले.

यात त्याची पत्नी, मुलगी, भाऊ आणि बहिणींचा समावेश होता.

बहावलपूर हे मसूद अजहरचे मूळ गाव असून, जैश-ए-मोहम्मदचा मुख्य आधारस्थान तिथेच असल्याचे मानले जाते.

भारताच्या कारवाईमुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का बसला आहे.

अजहरच्या प्रतिक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती आणि भारतीय हल्ल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.

Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-bharatachi-clear-role-mumbai-2411-nantarcha-sarvat-motha-halla/

Related News