गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे…
ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर
Related News
CJP आंदोलनावर कंगना रणौतचा जोरदार हल्ला; "सरकार कसं चालवायचं हा आमचा अधिकार"
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत रा...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनच्या विजयानंतर पुण्यातील एका क्लबमध्ये अर्जेंटिना आणि स्पेन समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत...
Continue reading
CJP Parliament March : दिल्लीत संसद मार्चदरम्यान तणाव; जे. पी. नड्डा यांची CJP शिष्टमंडळासोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या सरकारसमोर
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (
Continue reading
CJP Protest Live : मोठी घडामोड! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला; दिल्लीतील आंदोलनादरम्यान राजकीय हालचालींना वेग
नीट (NEE...
Continue reading
लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमल इंगळे यांचा हरवलेला iPhone पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शोधून दिला. CCTV फुटेज, पोलिसांची तत्परता आणि अभिनेत्रीने श...
Continue reading
Dhananjay Munde : ‘घटना कुठेही घडली तरी पावती माझ्याच नावावर’; धनंजय मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट...
Continue reading
Parliament Monsoon Session 2026 : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; ‘गेल्या महिन्यात भारताने अभिमानास्पद कामगिरी केली’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे विधान
संसदे...
Continue reading
मुंबईतील आंदोलनावरून नवा वाद; उद्धव ठाकरेंविरोधात कारवाईची गुणरत्न सदावर्तेंची मागणी
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप : दिल...
Continue reading
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांची जय पवार यांनी महत्त्वाची बैठक घेतली. भाजपविरोधातील नाराजी, संघटनात्मक बांधणी ...
Continue reading
भोर नगरपालिकेत विनापरवानगी फर्निचरची कामे केल्याच्या तक्रारीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचे कार्यालय सील केले. या अभूतपूर्व कारवाईमु...
Continue reading
"मला माझ्या वडिलांचा तिरस्कार वाटतो, कारण ते पुरुष आहेत..." ‘ Indias Got Talent 2 ’मधील साक्षी झाच्या विधानाने खळबळ
लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘
Continue reading
दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर शाई फेकणारी बरखा त्रैहन कोण आहे? तिची भूमिका, सोशल मीडिया पोस्ट, पुरुष हक्क चळवळ, उन्नाव प्रकरणावरी...
Continue reading
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
नागपूर : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी
तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित केला होता. यावेळी मणिपूरमधील हिंसाचार व
निवडणुकीबाबत भागवत यांनी आपली परखड मते व्यक्त केली.
ते म्हणाले की, देशात शांतता हवी आहे. प्रत्येक ठिकाणी व समाजात वाद उपयोगाचा नाही. गेल्या
वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. यापूर्वी तो दहा वर्षे शांत होता. जुन्या काळातील एकोप्याने
राहण्याची संस्कृती नाहीशी झाली असे वाटत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार अचानक सुरू झाला की तो मुद्दामहून
सुरू करण्यात आला, हे माहीत नाही. पण त्या आगीत तो अजूनही धुमसत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार?
आता त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले.
निवडणूक हे युद्ध नसून ती एक स्पर्धा आहे. आता निवडणूक झाली, निकाल लागला. सरकार स्थापन झाले.
तरीही हे कसे घडले? काय झाले?, त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आपल्या लोकशाही देशात दर पाच वर्षांनी
निवडणुका होत असतात. प्रत्येक निवडणुकीत आपले कर्तव्य आपण पार पाडतो. यंदाही ते केले आहे, असे भागवत म्हणाले.
विरोधी पक्ष नव्हे ‘प्रतिपक्ष’ म्हणा
निवडणूक सहमती बनवण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन बाजू समोर आल्या पाहिजेत.
त्यासाठीच ही व्यवस्था आहे. निवडणूक प्रचारात एकदुसऱ्यावर जोरदार टीका करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणे,
खोटी वृत्त प्रकाशित करणे अयोग्य आहे. विरोधी पक्षाला ‘प्रतिपक्ष’ असे म्हटले पाहिजे.
निवडणुकीच्या चष्म्यातून मुक्त होऊन देशासमोरील समस्यांचा विचार करायला हवा, असा सल्ला भागवत यांनी दिला.
Read Also https://ajinkyabharat.com/shri-malanggadavar-dard-krapoon-one-killed-and-two-injured-mulacha-jeev-vachavitaana-unfortunate-death-of-father/