अकोट : अकोट उपविभागातील महावितरण ची सर्विस लाईन विद्युत खांबासहित
लावण्याचे काम कालवाडी ते वरुड (जऊळका )मार्गावर सुरू आहे.
या मार्गावरील वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे.
या गंभीर प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोट गप्प का?
असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
अकोटच्या महावितरण विभागात सर्विस लाईन टाकण्यासाठी झाडांची कत्तल करणे या
गंभीर प्रकाराबद्दल वृक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महावितरण ची सर्विस लाईन टाकण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने वृक्षांची कत्तल करण्यासाठी परवानगी घेतली आहे का?
असा प्रश्न कालवाडी गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
कालवाडी ते वरुड जऊळका मार्गावर होत असलेल्या वृक्षांची कत्तल संदर्भात सार्वजनिक बांधकाम
अकोट उपविभागाने तात्काळ दखल घ्यावी अशी कालवाडी ग्रामस्थांची मागणी होत आहे.
चौकट
अकोट तालुक्यातील अनेक ठिकाणी वृक्षांची कत्तल होताना दिसून येत आहे.
या गंभीर प्रकाराकडे स्थानिक प्रशासन हतबल होताना दिसून आले आहे.
मागील पंधरा दिवसांपासून महावितरणच्या अकोट उपविभागात वृक्ष कटाई च्या नावावर लोडसेडींग करण्यात येत आहे.
वृक्षांची कटाई थांबण्यासाठी संबंधित विभागाने वृक्ष कटाई करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी.
अशी मागणी अकोट तालुक्यातील वृक्ष प्रेमींच्या वतीने केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/a-new-air-defense-system-will-come-in-indian-army/