अहमदनगर : ‘महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडले नाही. ईडी सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्यायव्यवस्थेवरील दबाव सर्वत्र अस्थिरता यामुळे देशात भाजपा विरोधी मोठी लाट आहे. राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसल्याने महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा जागा नक्की मिळतील,’ असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये आयोजित सभेत थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, पंतप्रधानांनी भाषण करताना दहा वर्षात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षांत करावयाची कामे याचा अहवाल जनतेला दिला पाहिजे. मात्र सध्याचे पंतप्रधान हे धर्माचे राजकारण करत आहेत. देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. न्यायव्यवस्था दबावात आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाला आहे. देशासाठी ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंवर अन्याय झाल. मात्र पंतप्रधानांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सर्वत्र अस्थिरता आणि अनागोंदी आहे. देशाच्या इतिहासात भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल. त्यांनी कितीही ४०० पारचे नारे दिले तरी २०० चा आकडाही त्यांना गाठता येणार नाही, असेही थोरात म्हणाले.
वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासंबंधी थोरात म्हणाले, ‘वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना काँग्रेसने मोठी संधी दिली. आपल्याकडे कायम त्यांचा सन्मान होत होता. राज्यात आणि देशपातळीवरही काम करण्याची संधी होती. शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आपण मोठा प्रयत्न केला. हे सर्वांना माहिती आहे. मात्र रूपवते यांनी काँग्रेस सोडणे हे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे, असे ठरणार असल्याने मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
Related News
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची
धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता
मंत्रालयातील मुख्यम...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले ...
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
पुण्यात गजानन मारणेच्या गुंडांनी एका मिरवणुकीदरम्यान
भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केली होती.
पुण्यात आल्यावर या कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घे...
Continue reading
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झे...
Continue reading
शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’,
असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला.
तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली....
Continue reading
आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस
गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार,
बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच स...
Continue reading
संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.
आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत,
ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत.
दुसरं काही नाही. आमच्या हातात फक्...
Continue reading
Raosaheb Danve BJP : भाजपचे रावसाहेब दानवे म्हणजे एकदम रांगडी व्यक्तिमत्व.
जे मनात आले ते कोणताही मुलाहिजा न ठेवता बोलून मोकळं व्हायचं, असा त्यांचा स्वभाव,
पण याचमुळे ते अनेक...
Continue reading
"थुंका ना मग. जनता तुमच्यावर थुंकली म्हणून तुम्ही लोकसभेला वाहून गेलात.
विधानसभेला पाप करुन निवडून आलात. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना शिव्या घालतात.
तुमचा पक्ष मोठा नसून छोटा आहे. ...
Continue reading