सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पुष्पा चित्रपटामुळे कशा पद्धतीने चंदनाची तस्करी होते हे तुम्ही पाहिलं असेल.
त्याच पद्धतीने सह्याद्रीच्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या खैर या झाडांचा लाकडांची देखील तस्करी मोठ्या प्रमाणात होते.
Related News
बाळापुर तालुका अंतर्गत येत असलेले कळंबा बुद्रुक येथे दिनांक 6/6/2025 रोजी मा. आमदार साहेब नितीन बापू देशमुख
यांच्या वाढदिवसानिमित्त व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्...
Continue reading
कर्नाटक | 4 जून 2025
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावत इतिहास रचला.
मात्र या आनंदाच्या क...
Continue reading
बेंगलोर मध्ये आर सी बी ची (RCB) विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू लाठीचार्ज झाल्यानंतर झाली
धावपळ काही लोक त्यामध्ये घायल बेंगलुरु मधून यावेळी सर्वात मोठी बातमी समोर येत आह...
Continue reading
तेल्हारा, दि. ३ (ता.प्र.) –
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून काही
लाभार्थ्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट राहिले आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यां...
Continue reading
रोहित पवारांनी हेलिकॉप्टर मधून उतरून ग्राउंड लेव्हल वर येऊन काम करावं
असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.
अजित पवार पक्षात एकाकी पडले असल्याचं राष...
Continue reading
गोरखपूरच्या सहजनवा पोलीस ठाण्याच्या बाहिलपार गावात हृदयद्रावक घटना घडली आहे.
अंगद शर्मा नावाच्या पतीने आपल्या पत्नी नेहा हिचा गळा चिरून खून केला आणि सुमारे एक
तास तिच्या मृतदेहाज...
Continue reading
उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कानपूर दरम्यानचा प्रवास आता फक्त ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
लखनऊ विकास प्राधिकरण (LDA) ने या महत्त्वाकांक्षी रॅपिड रेल प्रकल्पासाठी
...
Continue reading
गेल्या १५ दिवसापासून जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा खेळखंडोबा झाला आहे,
परिणामी जियो मोबाईल नेटवर्क धारक फार कंटाळले आहेत सुरुवातीला ग्राहकांना लाडीगोडीने
लोकांना जियो सिम घ...
Continue reading
उत्तराखंड: राज्यात प्री-मान्सूनच्या पावसाने वातावरणात बदल जाणवू लागला असून,
आज (४ जून) हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
देहरादून, टिहरी, हरिद्वार आणि पौडी...
Continue reading
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना संलग्न संघर्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी
कामगार तथा मजूर युनियन च्या राज्य संघटनेच्या सरचिटणीस पदी संगीता जाधव महाराष्ट्...
Continue reading
गावालगतच्या शिवाजी नगर शेतशिवारातील गोठ्यावर काल रात्री अचानक झालेल्या
हल्ल्यात तीन बकर्या व दोन वासरांचा मृत्यू झाला. ही घटना विजय रघुनाथ निमकर्डे व रवी रघुनाथ
...
Continue reading
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अकोल्यात कोरोनाचा शिरगाव झाला आहेय.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाचे दोन रुग्ण आढलून आलेय.
या दोन्ही रुग्ण...
Continue reading
याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
खैर हे संरक्षित यादीतील वृक्ष असून देखील त्याची मोठ्या प्रमाणात तोड होते आहे.
एकीकडे वन विभागाने खैर संवर्धनासाठी विविध नियम लागू केले असतानाही, कोकणातील काही व्यापारी या वृक्षांची
अवैध तोड करून लाकूड कर्नाटक आणि गोवा येथील कारखान्यांना पुरवतात, जिथे ते गुटखा, मावा, पान,
सुपारी कात इत्यादी वस्तूंच्या उत्पादनात वापरले जाते. साताऱ्यातील जावळी तालुक्यात ही वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.
जावळी वनपरिक्षेत्राधिकार्यांनी यापूर्वी १६ कारवाया केल्या आहेत, तरीदेखील ही वृक्षतोड सुरूच आहे.
ही वृक्षतोड रोखण्यासाठी सातारातील उपवनसंरक्षकांनी मेढा, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यांच्या सीमेवर गस्त पथक वाढवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने जर खैर ची तोड होत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी दिला आहे.
खैर वृक्ष का महत्वाचा?
खैर वृक्षाचे वैज्ञानिक नाव Senegalia catechu असे आहे. खैर वृक्ष प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगर उताराला असणाऱ्या जमिनीवर आढळतात.
खैराचे लाकूड कठीण, टिकाऊ आणि वाळवीरोधक असते. त्यामुळे त्याचा वापर घरबांधणी, शेतीची अवजारे आणि इतर बांधकामांमध्ये होतो.
खैराच्या लाकडापासून कात (कत्था) तयार केला जातो, त्याच बरोबर गुटखा, पान मसाला बनविण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो.
फक्त 250 ते 300 रूपयात व्यापारी शेतकऱ्याचा शेतजमिनीतील ही झाडे विकत घेतात
अल्प दरात कोकणातील व्यापारी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गायरान जमिनीत असणारी ही झाडे तोडून त्याचे रॅकेट चालवत आहेत.
पण अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतो.
त्यामुळे, वन विभागाने कठोर पावले उचलून आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने या वृक्षतोडीला आळा घालणे आवश्यक आहे.