सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पुष्पा चित्रपटामुळे कशा पद्धतीने चंदनाची तस्करी होते हे तुम्ही पाहिलं असेल.
त्याच पद्धतीने सह्याद्रीच्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या खैर या झाडांचा लाकडांची देखील तस्करी मोठ्या प्रमाणात होते.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
खैर हे संरक्षित यादीतील वृक्ष असून देखील त्याची मोठ्या प्रमाणात तोड होते आहे.
एकीकडे वन विभागाने खैर संवर्धनासाठी विविध नियम लागू केले असतानाही, कोकणातील काही व्यापारी या वृक्षांची
अवैध तोड करून लाकूड कर्नाटक आणि गोवा येथील कारखान्यांना पुरवतात, जिथे ते गुटखा, मावा, पान,
सुपारी कात इत्यादी वस्तूंच्या उत्पादनात वापरले जाते. साताऱ्यातील जावळी तालुक्यात ही वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.
जावळी वनपरिक्षेत्राधिकार्यांनी यापूर्वी १६ कारवाया केल्या आहेत, तरीदेखील ही वृक्षतोड सुरूच आहे.
ही वृक्षतोड रोखण्यासाठी सातारातील उपवनसंरक्षकांनी मेढा, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यांच्या सीमेवर गस्त पथक वाढवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने जर खैर ची तोड होत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी दिला आहे.
खैर वृक्ष का महत्वाचा?
खैर वृक्षाचे वैज्ञानिक नाव Senegalia catechu असे आहे. खैर वृक्ष प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगर उताराला असणाऱ्या जमिनीवर आढळतात.
खैराचे लाकूड कठीण, टिकाऊ आणि वाळवीरोधक असते. त्यामुळे त्याचा वापर घरबांधणी, शेतीची अवजारे आणि इतर बांधकामांमध्ये होतो.
खैराच्या लाकडापासून कात (कत्था) तयार केला जातो, त्याच बरोबर गुटखा, पान मसाला बनविण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो.
फक्त 250 ते 300 रूपयात व्यापारी शेतकऱ्याचा शेतजमिनीतील ही झाडे विकत घेतात
अल्प दरात कोकणातील व्यापारी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गायरान जमिनीत असणारी ही झाडे तोडून त्याचे रॅकेट चालवत आहेत.
पण अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतो.
त्यामुळे, वन विभागाने कठोर पावले उचलून आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने या वृक्षतोडीला आळा घालणे आवश्यक आहे.