९ मे २०२५ | नवी दिल्ली
भारतातील अनेक कुटुंबांना सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून दरमहा कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते.
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम’ (NFSA) अंतर्गत देण्यात येणाऱ्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
Related News
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं रेशन कार्ड कायमचं रद्द होऊ शकतं.
सरकारच्या नियमांनुसार, दीर्घकाळ वापरात न आलेले रेशन कार्ड ‘इनॲक्टिव्ह’ मानले जाते.
म्हणजेच, जर एखाद्या कुटुंबाने अनेक महिन्यांपासून आपल्या रेशन कार्डवर शिधा उचलला नसेल,
तर त्यांचे कार्ड थेट बंद करण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा रेशन मिळवण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागतो.
हे टाळण्यासाठी नागरिकांनी आपले रेशन कार्ड नियमितपणे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे किंवा ज्यांनी स्थलांतर केले आहे, त्यांनी आपल्या कार्डाची स्थिती वेळोवेळी तपासावी.
रेशन कार्डसाठी पात्रता सरकारने निश्चित केली आहे आणि ती पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ मिळतो.
पात्र असलेल्या व्यक्तींनी स्थानिक अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.
सरकारकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देताना नियमांचे पालन झाले पाहिजे, यावर भर दिला जात आहे.
त्यामुळे जाणीवपूर्वक किंवा अज्ञानामुळे रेशन न उचलणे ही मोठी चूक ठरू शकते.
Read Also : https://ajinkyabharat.com/adoption-nor-ran-hoil/