वाडेगाव येथील नदीपात्रात असलेला कोल्हापूरी बंधारा सध्या ओसंडून वाहत असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे आणि वरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहामुळे जलसाठा भरपूर प्रमाणात आहे.
Related News
मोदींना शरद पवारांनी दिला ‘तो’ सल्ला अन्… भेटीत काय घडलं? पवारांनी सांगितली आतली बातमी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय कोणाला? शरद पवारांनी थेट नाव घेतलं; म्हणाले, ‘हा युवा शक्तीचा विजय’
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचं नाव चर्चेत; संजय राऊतांचा मोठा दावा
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘हा तर लोकशाहीचा विजय!’
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला अन् संजय राऊत म्हणाले, ‘12 वर्षांनंतर असं आंदोलन झालं’
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लोकशाहीने कात टाकली’
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा? फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; अमित शाहांसोबत बैठकीची चर्चा
Dharmendra Pradhan यांचा अखेर राजीनामा? CJPच्या आंदोलनाला मोठं यश; विद्यार्थ्यांचा विजय!
सोनं दणकन आपटलं! भावात तब्बल 1,500 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचा नवा दर
घर घेण्यासाठी संपूर्ण बचत खर्च करावी का? आधी घर की गुंतवणूक? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
बटाट्यांपासून बनवा झटपट आणि पौष्टिक सॅलड; जाणून घ्या 4 भन्नाट रेसिपी
सरकारचं टेन्शन वाढलं! CJP, शेतकऱ्यांनंतर आता E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी चालकांचा संसदेला घेराव
याचा लाभ परिसरातील सिंचन विहिरींना व कूपनलिकांना होत असल्याने बागायती क्षेत्रासाठीही हा पाणीपुरवठा फायदेशीर ठरत आहे.
बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होत असल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. जलसाठा शंभर टक्के
भरल्याने सध्या बंधारा ओसंडून वाहत आहे, आणि त्यामुळे परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होत आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तींनी काढल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ५०% खाली आली होती.
मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे गेट पुन्हा लावण्यात आले आणि सध्याच्या परिस्थितीत बंधाऱ्यात पाणी पूर्ण क्षमतेने साठवले गेले आहे.
वाडेगाव आणि आसपासच्या गावांमध्ये बंधाऱ्याचा जलसाठा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
त्यामुळे या बंधाऱ्याच्या योग्य देखभालीसाठी स्थानिक प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shri-rishi-maharaj-yatra-mahotsav-at-patur-nandapur-13-january-2025/

