ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला
सिंधुदुर्ग : कट्टर शिवसैनिक रामू विखाळे यांच्यासह पत्नी – माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे
यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. विखाळे हे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जात. यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर,
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
मूर्तीजापूर (प्रतिनिधी): येथील जुनी वस्तीतील चंद्रशेखर आझाद चौक (मोरारजी चौक) येथे श्रीराम नवमीच्या निमित्ताने
भव्य भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजसेवक आतिष म...
Continue reading
युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत
विश्वासू साथीदार आणि कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला.
कलमठ ग्राम पंचायत सदस्य प्रियाली आचरेकर, युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, बूथ प्रमुख विनय हडकर,
शाखाप्रमुख प्रणय आचरेकर यांच्यासह नंदकिशोर कोरगावकर, निनाद विखाळे आणि जवळपास २०० शिवसैनिकांनी रविवारी भाजपात जाहीर प्रवेश केला.
वैभववाडीतील ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील
यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला.
मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य
कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला.
भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या स्टेटसची चर्चा सुरू आहे.
म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल, तर माणसंच काय जनावरं पण विश्वास टाकतात.
यावर मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. म्होरक्या उद्धव ठाकरे असून उद्धव ठाकरेंची लायकी त्यांच्या सहकाऱ्यांना आता
कळत असल्यामुळे त्या माणसाला स्वतःच्या भावाला, घर सांभाळता येत नाही, तो पक्ष काय सांभाळणार? असा सवाल नितेश राणेंनी विचारला.
उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली, तेवढी केव्हाही झाली नव्हती.
त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक मार्ग काढत वेगवेगळ्या पक्षात जात आहेत. स्वतःचं भविष्य घडवू शकले नाही,
ते दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार, अशी टीका मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
More update click here : https://ajinkyabharat.com/nagpurat-punha-ekda-saam-hardik-anani-suryakumar-khenar-saam-kavha/