ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला
सिंधुदुर्ग : कट्टर शिवसैनिक रामू विखाळे यांच्यासह पत्नी – माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे
यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. विखाळे हे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जात. यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर,
Related News
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी): अकोट नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला असून,
मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती माफ करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभ...
Continue reading
युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत
विश्वासू साथीदार आणि कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला.
कलमठ ग्राम पंचायत सदस्य प्रियाली आचरेकर, युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, बूथ प्रमुख विनय हडकर,
शाखाप्रमुख प्रणय आचरेकर यांच्यासह नंदकिशोर कोरगावकर, निनाद विखाळे आणि जवळपास २०० शिवसैनिकांनी रविवारी भाजपात जाहीर प्रवेश केला.
वैभववाडीतील ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील
यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला.
मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य
कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला.
भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या स्टेटसची चर्चा सुरू आहे.
म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल, तर माणसंच काय जनावरं पण विश्वास टाकतात.
यावर मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. म्होरक्या उद्धव ठाकरे असून उद्धव ठाकरेंची लायकी त्यांच्या सहकाऱ्यांना आता
कळत असल्यामुळे त्या माणसाला स्वतःच्या भावाला, घर सांभाळता येत नाही, तो पक्ष काय सांभाळणार? असा सवाल नितेश राणेंनी विचारला.
उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली, तेवढी केव्हाही झाली नव्हती.
त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक मार्ग काढत वेगवेगळ्या पक्षात जात आहेत. स्वतःचं भविष्य घडवू शकले नाही,
ते दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार, अशी टीका मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
More update click here : https://ajinkyabharat.com/nagpurat-punha-ekda-saam-hardik-anani-suryakumar-khenar-saam-kavha/