अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील
शेरवाडी गावातील ३२ वर्षीय युवा शेतकरी विवेक बाबाराव ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
गेल्या महिन्यात जिल्ह्यात सहा, तर फक्त मूर्तिजापूर मतदारसंघातच चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्य
विवेक ढाकरे हे वडिलोपार्जित ११ एकर शेती कसत होते. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते,
त्यामुळे संपूर्ण शेती व घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती. आईसोबत राहत असलेल्या विवेक यांना शेतीच्या
खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा भार होता. सततच्या नापिकी, वाढती महागाई,
आणि पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक तंगीने त्रस्त
असलेल्या विवेक यांनी शेवटी टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येचा प्रयत्न आणि मृत्यू
२६ मार्च रोजी नैराश्यातून त्यांनी घरातच कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी
तातडीने त्यांना मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबावर संकट – आता आईचे काय?
विवेक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या तीन बहिणींचे लग्न झाले असून,
कुटुंबात कमावणारा दुसरा कोणीच नाही. एका कर्त्या युवकाच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली असून,
शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजना आवश्यक
अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. कर्जमाफी,
शेतीला हमीभाव आणि पीकविमा यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन ठोस निर्णय घेतले नाहीत,
तर असे दुर्दैवी प्रसंग वारंवार घडत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.