अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील
शेरवाडी गावातील ३२ वर्षीय युवा शेतकरी विवेक बाबाराव ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
गेल्या महिन्यात जिल्ह्यात सहा, तर फक्त मूर्तिजापूर मतदारसंघातच चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्य
विवेक ढाकरे हे वडिलोपार्जित ११ एकर शेती कसत होते. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते,
त्यामुळे संपूर्ण शेती व घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती. आईसोबत राहत असलेल्या विवेक यांना शेतीच्या
खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा भार होता. सततच्या नापिकी, वाढती महागाई,
आणि पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक तंगीने त्रस्त
असलेल्या विवेक यांनी शेवटी टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येचा प्रयत्न आणि मृत्यू
२६ मार्च रोजी नैराश्यातून त्यांनी घरातच कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी
तातडीने त्यांना मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबावर संकट – आता आईचे काय?
विवेक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या तीन बहिणींचे लग्न झाले असून,
कुटुंबात कमावणारा दुसरा कोणीच नाही. एका कर्त्या युवकाच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली असून,
शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजना आवश्यक
अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. कर्जमाफी,
शेतीला हमीभाव आणि पीकविमा यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन ठोस निर्णय घेतले नाहीत,
तर असे दुर्दैवी प्रसंग वारंवार घडत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.