पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात दलदलीसारखी स्थिती झाल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत.
Related News
“The 50”: श्रुतीका अर्जुनचा तब्येतीच्या अडचणींनंतर दमदार कमबॅक; चाहत्यांसाठी दिला उत्साहवर्धक आरोग्य अपडेट
टीव्हीचा चर्चेतला आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रिऍलिटी शो “
Continue reading
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांना अपंगत्व, काहींना जीव गमवावा लागला आहे.
वाहने दलदलीत फसत असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. या रस्त्यांवरील कामे थांबलेली आहेत
आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
“साहेब, अजून किती जीव गेले की रस्ता करणार?” असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.
गावातून जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण हटवून सहा महिने उलटले तरी डांबरीकरण नाही,
ही वस्तुस्थिती असून, पावसात हे काम अधिक धोकादायक ठरत आहे.
प्रशासनाचे उत्तर
“कापशी रोड येथील सर्विस रोडचे ई-टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून,
ती पूर्ण झाल्यावर लगेच काम सुरू करण्यात येईल. सध्या सर्विस रोडवर जे खड्डे पडले आहेत, त्याचीही लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे,”
— भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग, अमरावती.
ग्रामस्थांचा इशारा
“उडाणपुलाजवळील सर्विस रोड अपूर्ण असल्याने दरवर्षी अपघात वाढतात.
यंदा तरी रोड पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर ठिय्या आंदोलन करू,”
— सचिन थोरात, माजी पंचायत समिती सदस्य, चिखलगाव.
पार्श्वभूमी
अकोला ते वाशिम राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 2–3 वर्षांपासून सुरू आहे.
मात्र, अनेक ठिकाणी सर्विस रोडचे काम थांबले असून, याकडे ना लोकप्रतिनिधींचं लक्ष, ना अधिकाऱ्यांची तत्परता दिसते.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न एकच – “जीव धोक्यात घालून किती दिवस हा रस्ता सहन करायचा?”
महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhamana-budrikamadhye-colracha-udrek-ek-nagrikacha-mrityu-gavat-bheetichan-environment/