दिल्ली | प्रतिनिधी
दिल्लीतील काँग्रेस पक्षात आणखी एक राजकीय फाटाफूट उफाळून आली आहे. तीन माजी आमदार आणि अनेक
माजी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत ‘दिल्ली प्रगती मंच’ या नावाने स्वतंत्र गट सुरू केला आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
सुधीर यादव, अनिता शर्मा आणि विनोद चावला हे या गटाचे प्रमुख चेहरे असून,
त्यांच्या सोबत २० हून अधिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते असल्याची माहिती समोर आली आहे.
पक्ष नेतृत्वावर आरोप
या नव्या गटाच्या नेतृत्त्वाने दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव आणि हायकमांडवर पक्षातील
कार्यकर्त्यांची दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. तसेच, स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवण्यास
काँग्रेस अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी ही वेगळी चळवळ सुरू केल्याचं जाहीर केलं आहे.
‘दिल्ली प्रगती मंच’ची भूमिका
नव्या गटाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आमचा उद्देश काँग्रेसच्या मूळ विचारसरणीशी
बांधील राहून दिल्लीच्या सामान्य नागरिकांसाठी संघर्ष करणे आहे.
सध्याचे नेतृत्व हतबल व निष्क्रिय झाले आहे, त्यामुळे आम्हाला नवी दिशा घ्यावी लागली.”
काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही
या गटफोडीनंतर काँग्रेसकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
मात्र, पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात या घडामोडीने नवीन पेच निर्माण केला आहे.
दिल्लीतील राजकारणात उलथापालथ
AAP मधील फाटाफुटीनंतर आता काँग्रेसमधील असंतोषामुळे दिल्लीच्या राजकीय पटावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
दोन्ही प्रमुख पक्षांत गटबाजी आणि असंतोषाचे सूर स्पष्ट होत चालले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/ankhi-a-shocking-incident-bazaar-samiti-doctorchaya-gharat-theft/