समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे – न्यायमूर्ती अनिल किलोर

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे – न्यायमूर्ती अनिल किलोर

वाडेगाव, दि. १९: संविधानाने दिलेले समान हक्क व अधिकार हे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत.

न्यायापासून कुणीही वंचित राहू नये, हे ‘सर्वांसाठी न्याय’ या ब्रीदाचे सार्थकत्व आहे,

असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.

Related News

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पातूर तालुक्यातील चान्नी

येथे आयोजित शासकीय सेवा व योजना महामेळाव्यात ते बोलत होते.

प्रमुख उपस्थिती:
कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. तिवारी, जिल्हाधिकारी अजित कुंभार,

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,

ॲड. मोतीसिंग मोहता, अॅड. हेमंत मोहता, न्यायाधीश कैलास कुरंदळे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महामेळाव्याचे मुख्य मुद्दे:

  • विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण.
  • गावातील वादविवाद गावातच सोडवण्यासाठी न्यायदूतांची सक्रियता वाढवण्याचा सल्ला.
  • ई-प्रणालीचा वापर करून कागदपत्रांशी संबंधित फाईल्सची सद्यस्थिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन.

प्रमाणपत्र वितरण:
महामेळाव्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली, त्यामध्ये:

  • बेबी केअर किट: पूजा लखन इंगळे, निकिता येनकर, कोमल अर्जुन टाले, कोमल धनंजय येनकर.
  • शासकीय योजना: श्रावणबाळ योजना, निराधार योजना, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र यांचे वितरण.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायाधीश विलास खांडबहाले व विभा दुर्षे यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश पैठणकर यांनी व्यक्त केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murder-case-in-beed-district-akolyat-jan-aakrosh-morcha/

Related News