केंद्राची घोषणा, 1975 मध्ये याच दिवशी लागू झाली होती आणीबाणी
केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे.
केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.
Related News
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
लोहारी खुर्द येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली; समाजजागृतीचा संदेश देत तरुणाईची प्रेरणादायी हाक
अकोट – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
Continue reading
प्रकाश आंबेडकर निवडणूक निकाल पुढे ढकलल्याबाबत आपले विधान करत सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. नागपूर खंडपीठाचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांन...
Continue reading
एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का? संजय राऊत यांचा दिल्लीवर जोरदार आरोप, शिंदे सेनेचे 35 आमदार फुटणार?
महाराष्ट्रातील महायुतीत सध्या राजकारणाच्या रणधुमाळी...
Continue reading
अंजली दमानिया दिल्लीत दाखल, अमित शाह यांची भेट मागितली; अजित पवार, पार्थ पवार आणि खारगे समितीवर थेट तीन मोठ्या मागण्या
राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या पुण्या...
Continue reading
महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष? — संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट आणि त्याचे अर्थ
मुंबई — शिवसेना (उद्धव भाग)चे खासदार आणि भाष्यकार संजय
Continue reading
संविधानावर बूट फेकणे म्हणजे लोकशाहीवरील हल्ला: सामना अग्रलेखातून तीव्र टीका
मुंबई:हिंदूंचे राज्य म्हणजे धर्मांधांचे नाही असा थेट इशारा सामनाच्या अग्र...
Continue reading
मोदींचा ७५ वा वाढदिवस : अमित शाह ते देवेंद्र फडणवीस – मोदींबरोबरच्या आठवणीमधील भावनिक किस्से
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर २०२५) आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या महत...
Continue reading
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह अपयशी गृहमंत्री असल्याचं म्ह...
Continue reading
इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा..
Continue reading
त्यात केंद्राने म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी
देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती,
त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस
‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या
सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे.
अमित शाह यांनी ट्विट केले की, ’25 जून 1975 रोजी
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत
देशात आणीबाणी लादून, भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला.
लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला.
भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’
म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश, हुकूमशाही सरकारच्या अगणित यातना
आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या
लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा आहे.’
अमित शाह यांनी लिहिले, ‘संविधान हत्या दिन लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी
आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत जिवंत ठेवण्यासाठी कार्य करेल,
जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.’
Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-fought-like-wagah-mamta-banerjee/