लखनऊ | १३ मे २०२५
भारताने अलीकडेच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या निर्णायक सैन्य कारवाईने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील आपली
भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
उद्देशून केलेल्या भाषणाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरद्वारे स्वागत केले असून,
मोदींच्या नेतृत्वाला “राष्ट्रवादी” असे संबोधले आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक सैन्य कारवाई नाही,
तर भारतातील मातांचे आणि बहिणींच्या सन्मानाचं संरक्षण करण्याचा आमचा निश्चय आहे.
जो कोणी सिंदूर पुसण्याचा प्रयत्न करेल, त्याचा मातीमध्ये समावेश होणे निश्चित आहे.”
आपल्या ट्वीटमध्ये योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे कौतुक करताना म्हटलं,
“हे भाषण नव्या भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचं स्पष्ट संकेत आहे. भारत आता गप्प बसणार नाही.
प्रत्येक प्रहाराला उत्तर दिलं जाईल… आणि आमच्या अटींवर दिलं जाईल.”
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोन जेव्हा
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर घुसले, तेव्हा फक्त इमारतीच नव्हे तर त्यांच्या हिम्मतीही ढासळल्या.
बहावलपूर आणि मुरीदकेसारखी ठिकाणं ही जागतिक दहशतवादाची विद्यापीठं होती.”
मोदी यांनी भारतीय सेना, गुप्तचर यंत्रणा आणि शास्त्रज्ञांचे विशेष आभार मानले व सांगितले की,
भारताचे संयम आणि सामर्थ्य दोन्ही जगाने पाहिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/lack-of-missed/