शासनाने वान धरणातील पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर
महापालिकेने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी
Related News
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी): अकोट नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला असून,
मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती माफ करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभ...
Continue reading
तयार केलेला ७३६ कोटींचा ‘डीपीआर’ रखडला होता.
शासनाच्या सुकाणू समितीने पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर
मनपाने बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव धरणातून पाणी आरक्षणासाठी धावाधाव सुरू केली होती.
अखेर विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने
जिगाव प्रकल्पातून २४.१३ दलघमी जलसाठ्याच्या आरक्षणावर
२० जून रोजी शिक्कामोर्तब केले.
यासंदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर
यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता.
शासनाच्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
अकोलेकरांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी
‘अमृत अभियान’ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने सन २०१७ मध्ये
११० कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता.
या निधीतून हद्दवाढ़ क्षेत्र वगळता शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे
सुमारे ४४५ किमीचे जाळे बदलणे तसेच आठ जलकुंभ उभारण्याचा समावेश होता.
संबंधित कंत्राटदाराने आठपैकी सात जलकुंभांचे काम पूर्ण केले असून
आठवा जलकुंभ अद्यापही उभारला नाही.
यादरम्यान, मनपाने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत
प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नागपूर येथील
पुराणिक ब्रदर्स एजन्सीची नियुक्ती केली.
२०१७ मध्ये मनपाने शहराची सन २०५५ पर्यंतची
संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून वान धरणातून
२४ दलघमी जलसाठ्याचे आरक्षण निश्चित केले होते.
तेल्हारा येथील शेतकऱ्यांचा विरोध पाहता
तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या कालावधीत
पाणी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती.
ही स्थगिती कायम असताना मनपाच्या निर्देशानुसार
पुराणिक ब्रदर्स एजन्सीने वान धरणातील २४ दलघमी पाणी आरक्षण
गृहीत धरून तब्बल ७३६ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला होता.
या अहवालाला राज्याच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली होती.
परंतु या धरणातील प्रस्तावित पाणी आरक्षणाला
तत्कालीन शासनाने स्थगिती दिली असतानाही
‘डीपीआर’ तयार करण्याच्या मनपाच्या भूमिकेवर
सुकाणू समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत
पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते.
सुकाणू समितीच्या निर्देशानंतर मनपा प्रशासनाने
बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात असलेल्या ‘जिगाव’ प्रकल्पातून
४८ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर केला होता.
परंतु आरक्षणाच्या मुद्यावर पाटबंधारे बोट ठेवत हा प्रस्ताव बाजूला सारला.
अखेर या संदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला.
त्यानंतर शासनाने २४.१३ दलघमीच्या जलसाठ्याला मंजूरी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/gurugram-sfotani-haadrale-fire-fighting-machine-manufacturing-factory-burnt-to-ashes/