शासनाने वान धरणातील पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर
महापालिकेने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
तयार केलेला ७३६ कोटींचा ‘डीपीआर’ रखडला होता.
शासनाच्या सुकाणू समितीने पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर
मनपाने बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव धरणातून पाणी आरक्षणासाठी धावाधाव सुरू केली होती.
अखेर विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने
जिगाव प्रकल्पातून २४.१३ दलघमी जलसाठ्याच्या आरक्षणावर
२० जून रोजी शिक्कामोर्तब केले.
यासंदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर
यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता.
शासनाच्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
अकोलेकरांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी
‘अमृत अभियान’ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने सन २०१७ मध्ये
११० कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता.
या निधीतून हद्दवाढ़ क्षेत्र वगळता शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे
सुमारे ४४५ किमीचे जाळे बदलणे तसेच आठ जलकुंभ उभारण्याचा समावेश होता.
संबंधित कंत्राटदाराने आठपैकी सात जलकुंभांचे काम पूर्ण केले असून
आठवा जलकुंभ अद्यापही उभारला नाही.
यादरम्यान, मनपाने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत
प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नागपूर येथील
पुराणिक ब्रदर्स एजन्सीची नियुक्ती केली.
२०१७ मध्ये मनपाने शहराची सन २०५५ पर्यंतची
संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून वान धरणातून
२४ दलघमी जलसाठ्याचे आरक्षण निश्चित केले होते.
तेल्हारा येथील शेतकऱ्यांचा विरोध पाहता
तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या कालावधीत
पाणी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती.
ही स्थगिती कायम असताना मनपाच्या निर्देशानुसार
पुराणिक ब्रदर्स एजन्सीने वान धरणातील २४ दलघमी पाणी आरक्षण
गृहीत धरून तब्बल ७३६ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला होता.
या अहवालाला राज्याच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली होती.
परंतु या धरणातील प्रस्तावित पाणी आरक्षणाला
तत्कालीन शासनाने स्थगिती दिली असतानाही
‘डीपीआर’ तयार करण्याच्या मनपाच्या भूमिकेवर
सुकाणू समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत
पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते.
सुकाणू समितीच्या निर्देशानंतर मनपा प्रशासनाने
बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात असलेल्या ‘जिगाव’ प्रकल्पातून
४८ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर केला होता.
परंतु आरक्षणाच्या मुद्यावर पाटबंधारे बोट ठेवत हा प्रस्ताव बाजूला सारला.
अखेर या संदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला.
त्यानंतर शासनाने २४.१३ दलघमीच्या जलसाठ्याला मंजूरी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/gurugram-sfotani-haadrale-fire-fighting-machine-manufacturing-factory-burnt-to-ashes/