किन्हीराजा दि ५ जून २५
वाशीम जिल्हातील मालेगांव तालुक्यात येत असलेल्या गणेशपूर(गिव्हा) येथिल शेतकरी महिलेच्या जेसीबी चालक
पुञाने कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
बुधवार ४ जून रोजी दूपारी बोराळा शेतशिवारात घडली असून प्रदीप सुखदेव ठाकरे (३२)असे मृतकाचे नांव आहे.
मिळालेल्या प्राप्त माहिती नूसार प्रदीप ठाकरे हा मालेगांव तालुक्यातील गणेशपूर (गिव्हा) येथिल रहिवासी असुन
त्याचेकडे त्याची आई सौ.सुमनबाई ठाकरे यांच्या नांवाने थोडीफार शेती आहे.प्रदीप हा विवाहित असून त्याला
दोन व तीन वर्षाच्या लहान लहान दोन मुली आहेत. प्रदीप हा जेसीबी आॅपरेटर (चालक) होता.
त्याने एका खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर सुध्दा घेतला असल्याची माहीती मिळाली आहे.
प्रदीप ठाकरे हा ४ जून रोजी एरंडा येथिल आपल्या मालकाची पोकलॅंड मशिन घेऊन बोराळा येथिल शेतकरी
दिनकर नामदेव वानखेडे यांच्या गट क्रंमाक १४६ मधिल शेतातील विहीरी मधिल गाळ काढण्या करीता गेला होता.
विहीरी मधून गाळकाढण्याचे काम सूरु असतांना प्रदीप ठाकरे याने त्याच शेतातील ३० फूट ऊंच असलेल्या मोहाच्या
झाडाला जमिनीपासून १५ फूट अंतरावर दोरीच्या सहाय्याने दुपारी ४ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
प्रदीप ठाकरे हा गेल्या काही दिवसापासून आर्थिक विवंचनेत होता.त्याला खाजगी कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची
चिंता सतावत होती अशी माहीती त्याच्या एका मिञाने दिली.या घटनेची माहिती जऊळका ठाणेदारांना मिळताच ठाणेदार
हिवरकर यांनी पोलीस कर्मचार्यासह घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करुन मृतदेह ऊत्तरीय तपासणीसाठी हलविला.
जउळका पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रकरण तपासात घेतले आहे.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्या नंतरच मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavasane-vishranti-ghetali-real-way-to-punha-aapla-vine-done/