जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
IPL 2025 समापन सोहळा: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराला समर्पित देशभक्तीचा जलवा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता लवकरच; आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
सलमान खानचा नवा लुक व्हायरल, ‘भाईजान’च्या मिशांवर फिदा झाले फॅन्स!
PBKS vs RCB IPL Final 2025: पहिल्यांदा विजेतेपदासाठी भिडणार
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा
या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
बोर्डी शेतशिवारात प्रि मान्सून कपाशीची लागवड
अकोला जिल्हा ॲडॉक स्केटिंग कमेटी चा सलग ९ तास स्केटिंग उपक्रम यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर संध्याकाळी साडेचार च्या सुमारास भीषण अपघात
पिंजर पोलिसांनी दोन दिवसातच इलेक्ट्रिक तार चोरांना केली मुद्देमालासह अटक
अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय अभियातांची हत्या…
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/