भव्य शोभायात्रेतील झाक्या ठरल्या लक्षवेधी
प्रतिनिधी / मूर्तिजापूर
स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरात
भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. “जय ज्योती, जय क्रांती!” च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
Related News
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
माळीपुरा येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेत महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध झाक्यांनी जनतेचे विशेष लक्ष वेधले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत प्रशांत शेलवंटे तर सावित्रीबाई फुले यांच्या
भूमिकेत सौ. शेलवंटे यांनी समर्पक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
शोभायात्रा माळीपुरा, टांगा चौक, मोरारजी चौक, भगतसिंग चौक मार्गे स्टेशन
भागातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, मठ्ठा, आईस्क्रीम आदींची उत्तम सोय करण्यात आली होती.
संपूर्ण शोभायात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पडली.
या शोभायात्रेचे आयोजन क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी समस्त समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य आयोजनातून फुलेंच्या विचारांचा जागर आणि नव्या पिढीला सामाजिक समतेचा संदेश दिला गेला.