भव्य शोभायात्रेतील झाक्या ठरल्या लक्षवेधी
प्रतिनिधी / मूर्तिजापूर
स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरात
भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. “जय ज्योती, जय क्रांती!” च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
Related News
उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,
मशालीतून उठली आग – शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी ‘प्रहार’चा एल्गार!
२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल
अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी
Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाचा उपक्रम – 14 व 15 एप्रिलला मोफत टूर सर्किट
किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान
माळीपुरा येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेत महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध झाक्यांनी जनतेचे विशेष लक्ष वेधले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत प्रशांत शेलवंटे तर सावित्रीबाई फुले यांच्या
भूमिकेत सौ. शेलवंटे यांनी समर्पक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
शोभायात्रा माळीपुरा, टांगा चौक, मोरारजी चौक, भगतसिंग चौक मार्गे स्टेशन
भागातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, मठ्ठा, आईस्क्रीम आदींची उत्तम सोय करण्यात आली होती.
संपूर्ण शोभायात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पडली.
या शोभायात्रेचे आयोजन क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी समस्त समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य आयोजनातून फुलेंच्या विचारांचा जागर आणि नव्या पिढीला सामाजिक समतेचा संदेश दिला गेला.