मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या बकरी चोरी प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
माना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्र. ०१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३१७ (२), ३ (५) बीएलएस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सतीश रघुनाथ पाथरे (वय ३४, रा. गुर्जवाडा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान गुर्जवाडा शेतशिवारातील गट क्रमांक ७५ येथून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांची चोरी केली होती.
या प्रकरणात यापूर्वी एका आरोपीकडून चोरीस गेलेल्या बकऱ्या जप्त करण्यात आल्या होत्या, तर उर्वरित आरोपी फरार होते. पोलिसांनी तांत्रिक तपास व शोधमोहीम राबवून खालील आरोपींना अटक केली —
Related News
2 टप्प्यांत पतीची हत्या; गच्चीवरून ढकलल्यानंतर सलाईनमध्ये टॉयलेट क्लिनर टाकल्याचा आरोप
सिया गोयलचे कथित 1 Snapchat चॅट समोर, तपासाला नवे वळण ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!
केतन अग्रवाल हत्याकांडात 5वा धक्कादायक खुलासा! सिया-चेतनच्या जवळच्या व्यक्तीचं नाव समोर, तपासाला मोठं वळण
FDA छाप्याची धमकी देत 50,000 रुपयांची खंडणी मागण्याचा प्रयत्न; भिवंडीतील हॉटेलमध्ये दोन मुंबईकरांवर गुन्हा
विधान भवनात माजी आमदार राहुल बोंद्रे दिसल्याने खळबळ ; 15 दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी
Lohagad Murder Case: 7 धक्कादायक खुलासे! लग्नाच्या शॉपिंगसाठी उकळले ₹1 कोटी, प्रियकरासाठी रचला थरारक हत्येचा कट
28 वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या पत्नी आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, व्हिडिओमुळे खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर 3 वाहनांचा भीषण अपघात; 1 ठार, 7 गंभीर जखमी, धक्कादायक कारण समोर
5 धक्कादायक खुलासे! केतन अगरवाल Murder Case मध्ये सीन रिक्रिएशनदरम्यान समोर आला संपूर्ण कट
रोहन रामराव ढोके (वय २१, रा. उमरी बाजार, ता. दर्यापूर, जि. अमरावती)
मोहन जीवन शिवरकर (वय ३२, रा. पार्डी, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती)
मयूर हिम्मतराव ढोके (वय २८, रा. उमरी ममदाबाद, ता. दर्यापूर)
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एमएच २७ एच ९४२२ क्रमांकाचे चारचाकी वाहन (अंदाजे किंमत ₹६०,०००) तसेच एमएच २७ एचजी ८३७२ क्रमांकाची दुचाकी (अंदाजे किंमत ₹२५,०००) जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सुशील आठवले आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री मेंढे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
माना पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास माना पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
