सांगली : विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही, हे 4 जूनला कळेल. त्यांनी जर चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच आम्ही कदमांना वाघाची पदवी देऊ, असा खोचक टोला संजय राऊतांनी विश्वजीत कदम यांना लगावला आहे. संजय राऊत सांगलीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सांगलीचा वाघ कोण? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांगलीत वसंतदादा पाटील हे वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलेले आहेत. वाघाची रचना आणि स्वभाव वेगळा असतो. विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. त्यांनी जर चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच आम्ही कदमांना वाघाची पदवी देऊ. अशा अनेक वाघांनी चंद्रहार पाटलांना विजयी केलं पाहिजे. मग आम्ही 4 जूनला त्या वाघांचा जाहीर सत्कार करू. जयंत पाटीलांची डरकाळी ही वाघाची डरकाळी आहे. सांगलीमध्ये मला बरेच वाघ दिसत आहेत, त्या वाघाचं जतन करणं गरजेचं आहे.
अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षांनी अनेक ठिकाणी उभे केलेत, ते कमजोर वाटत असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करतंच आहोत ना, आम्ही तो कमजोर आहे म्हणून सांगत नाही, आम्ही वाघ आहेत आम्ही त्याला पुढे घेऊन जाऊ. त्या उमेदवाराला विजयी करणं शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे.’ अशी भावना देखील राऊतांनी व्यक्त केली आहे.
Related News
बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या आरोपाने खळबळ; गुन्हा दाखल, राजकारण तापलं
अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्...
Continue reading
भोंदू बाबा प्रकरणात दीपक केसरकरांची मोठी प्रतिक्रिया; “खरातशी ओळख म्हणजे गुन्ह्यात सहभागी होणे नाही” — गंभीर इशारा देत राऊतांचं नाव घेतलं!
नाशिकच्या कुख्यात
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
मुंबई, महाराष्ट्र – राज्याच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आतल्या राजकीय वातावरणात तणाव वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत. खासदारांच्या नाराजीमु...
Continue reading
निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकींची घोषणा केली आहे. या पाच राज्यांमध्ये मतदानाचे वेळापत...
Continue reading
महाराष्ट्र भाजपमध्ये पक्षसंघटनेच्या मजबुतीसाठी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी १२ नव्या प्रदेश उपाध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये केशव उपाध्...
Continue reading
राहुल गांधींना आणि २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने केली तीव्र टीका
राजकारणात पुन्हा एकदा गंभीर वाद उद्भवला असून, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
Om Birla No Confidence Motion : लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या विरोधात 100 हून अधिक खासदारांची स्वाक्षरी मोहीम सुरू. विरोधकांचे ...
Continue reading
Zilla Parishad निवडणूक निकाल 2026: अजितदादांच्या शेवटच्या सभेतील उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला खेड तालुक्यात मोठं यश
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
सांगलीच्या संदर्भात माझी राहुल गांधींशी चर्चा झालेली आहे. विशाल पाटील यांच्यासंदर्भात दिल्लीतील नेत्यांशी चर्चा झालेली आहे. माझ्या पद्धतीने मी चर्चा करतो, अशी माहिती देत सांगत सांगलीतील तिरंगी लढतीबाबत राऊत म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार आहेत सांगलीत. एका उमेदवाराचा प्रचार स्वत: भाजपा करतंय तर दुसऱ्या बाजूला प्रचार करण्यासाठी काही लोक नेमलेत. तरी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील करतील.’
मोदींच्या ठाकरेंविषयीच्या वक्तव्यावर प्रहार करत राऊत म्हणाले की, ‘मोदी स्वत: अडचणीत आहेत, त्यामुळे अडचणीत असलेला व्यापारी हा नेहमी खोटं बोलत असतो. जर ठाकरेंबदल प्रेमाचा बाणा असता तर मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. मोदींचं शिवसेनेवरचं प्रेम खोटं आहे.’