तालुक्यातील बेलखेड शिवारात अल्पभूधारक शेतकरी अशोक पुंडलिक धुमाळे यांच्या ऊसाच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. सर्वे क्रमांक ७९१ मधील या घटनेमुळे ऊसाचे मोठे क्षेत्र जळून खाक झाले असून सिंचनासाठी वापरली जाणारी बोरची केबल, स्प्रिंकलर पाईप व इतर साहित्य पूर्णतः नष्ट झाले आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील वीजपुरवठा लाईनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि कोरड्या उसाला आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. शेजारील शेतकऱ्यांनी धूर व ज्वाळा दिसताच तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून गेला होता.
शेतकरी अशोक धुमाळे यांनी सांगितले की, “या आगीत माझ्या अनेक महिन्यांच्या परिश्रमावर पाणी फिरले. ऊसासोबतच स्प्रिंकलर पाईप, केबल आणि इतर सिंचन साहित्य जळाले आहे. मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने तातडीने मदत द्यावी.” त्यांनी पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Related News
बाळापूर तालुक्यात रोहीचा हैदोस ; अळोशी–कळोशी शिवारात ३ एकर गहू पीक उद्ध्वस्त
पुंडा गाव बनले प्रभारी कर्मचाऱ्यांचे ‘माहेरघर’; ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका प्रभारी – पोलिस पाटील, कोतवाल पदे रिक्त
सावकारी कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
पातूर तालुक्यातील सावरगाव विहिरी सर्वेक्षणात घोटाळ्याची चौकशी सुरू
Mumbaiत मध्यरात्री हादरा: चांदिवलीतील नारायण प्लाझा इमारतीला भीषण आग, 2 तरुणांचा मृत्यू
2026 Mumbai अग्निकांड: डॉकर्यार्ड रोडजवळील कापूस वेअरहाऊसमध्ये भीषण आग
परंपरा जपत डांगरखेड गावात शंकर पटाचा जल्लोष
Mumbaiत सार्वजनिक ठिकाणी धाडसी वर्तन, तरुणावर अग्निशमन दलाची बचाव कारवाई
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका, केंद्राकडे मदत मिळण्यासाठी प्रस्ताव प्रलंबित
दिल्ली Red Fort Car Blast: 7 गोष्टी जे तुम्हाला माहित असायला हव्यात!
जांभोरा शेतकऱ्यांवर पुन्हा संकट!10 ते 12 गावांना मोठा फटका
धोकादायक विद्युत रोहीत्र उघडे: 5 गंभीर धोके शेतकऱ्यांसाठी, बाळापूर विद्युत विभागाने त्वरित कारवाई केली पाहिजे”
घटनेची पाहणी करून प्रशांत डिक्कर यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली. “अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अशी आपत्ती मोठा धक्का असतो. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून त्वरित मदत जाहीर करावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना आधार मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांनीही विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप केला आहे. शेतातील वीजवाहिन्यांची नियमित तपासणी व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे बेलखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
