नवी दिल्ली | प्रतिनिधी —
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदलाचे अधिकारी
लेफ्टनंट विनय नरवाल (वय 26) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, विनय नरवाल यांचा केवळ
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
आठ दिवसांपूर्वीच हिमांशी नरवाल यांच्यासोबत विवाह झाला होता.
हनीमूनसाठी युरोपला जाण्याचा प्लॅन असतानाही वीजा न मिळाल्याने त्यांनी काश्मीरचा पर्याय निवडला होता.
21 एप्रिल रोजी नवविवाहित दाम्पत्य काश्मीरमध्ये दाखल झाले होते आणि दुसऱ्या दिवशी
त्यांनी पहलगाम येथील हॉटेलमध्ये चेक इन केले. 22 एप्रिलला बैसरन व्हॅली या मिनी स्वित्झर्लंड म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळी ते फिरण्यासाठी गेले असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.
हिमांशी नरवाल यांनी हल्ल्यानंतर दिलेल्या जबाबात सांगितले की, “मी आणि माझे पती विनय भेलपुरी खात होतो,
तेव्हा एक व्यक्ती आला आणि म्हणाला – ‘हा मुस्लिम नाही’ आणि लगेच गोळी झाडली.”
विनय यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. हिमांशी यांना दहशतवाद्यांनी काही इजा केली नाही.
विनय नरवाल हे हरियाणातील करनाल शहरातील सेक्टर 7 येथे राहणारे होते.
ते इंजिनीअरिंग पदवीधर असून तीन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय नौदलात प्रवेश केला होता.
सध्या ते केरळच्या कोची येथे कार्यरत होते.
त्यांचे वडील राजेश कुमार हे पानिपत येथील कस्टम्स विभागात सुपरिटेंडंट पदावर कार्यरत आहेत.
आई आशा देवी या गृहिणी आहेत, तर बहिण सृष्टि नरवाल दिल्लीमध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करत आहे..
विनय यांचे आजोबा हवा सिंह हे हरियाणा पोलिस दलात कार्यरत होते आणि 2004 साली सेवानिवृत्त झाले.
नवविवाहित आयुष्य सुरू करण्याआधीच आयुष्य संपलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे.
देशासाठी समर्पित एक उमदा युवा अधिकारी एका भ्याड हल्ल्यात शहीद झाला असून त्यांच्यावर अंतिम संस्कार सैन्यविधीने करण्यात येणार आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/srinagarhun-yenyasathi-aircraft-tikitancha-dar-tippat/